शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

सोलापूरात स्मार्ट सिटीच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 14:57 IST

सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे रंगभवन सभागृहात आयोजित स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांचा शुभारंभ व स्मार्ट रोडच्या ई-भूमिपूजनप्रसंगी राजकीय टोलेबाजी रंगली.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना विलंबस्मार्ट रस्त्याचे टेंडर प्रतिसादाअभावी तीनवेळा काढावे लागलेपाणी प्रकल्पासाठी ३७४ कोटींची तरतूददोन वर्षांच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटीचे जास्तीत जास्त प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील : महापौर शोभा बनशेट्टी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : स्मार्ट सिटीची कामे रेंगाळली आहेत. लोकात फिरताना आम्हाला याबाबत तोंड द्यावे लागते. स्मार्ट सिटीचे पैसे शिल्लक आहेत, आता उर्वरित कामे वेगाने मार्गी लावा, अशी अपेक्षा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या प्रकल्प शुभारंभप्रसंगी व्यक्त केली. तर, याच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चांगल्या कामाला वेळ लागतो. तुम्ही पूर्वेतिहास पाहा, चारी दिशेला फलक लागले पण कामे झाली नाहीत. स्मार्ट प्रकल्प साकारण्यासाठी आराखडा, टेंडर प्रक्रियेला वेळ लागतो. आता सोलापुरात सर्व अधिकारी चांगले आहेत. त्यामुळे कायापालट होईल, असा विश्वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे रंगभवन सभागृहात आयोजित स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांचा शुभारंभ व स्मार्ट रोडच्या ई-भूमिपूजनप्रसंगी ही राजकीय टोलेबाजी रंगली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रिमोटद्वारे या कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी, खासदार शरद बनसोडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, सभागृहनेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी, परिवहन सभापती दैदीप्य वडापूरकर यांच्यासह सर्व गटनेते, सदस्य उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविकात कंपनीचे सीईओ तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना विलंब झाल्याचे नमूद केले. अडचणींवर मात करून पुढे जात आहोत. स्मार्ट रस्त्याचे टेंडर प्रतिसादाअभावी तीनवेळा काढावे लागले. स्मार्ट सिटीत ४६ प्रकल्प असून, आता प्राधान्यक्रमाचे प्रकल्प हाती घेण्यात येतील. त्यात पाणी प्रकल्पासाठी ३७४ कोटींची तरतूद असून, यातून एबीडी एरियाबरोबरच इतर भागातील समस्या सोडविली जाईल. आॅक्टोबरमध्ये होणाºया संचालक मंडळाच्या बैठकीत पाणी व कचरा संकलनाच्या प्रकल्पावर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. पोलीस आयुक्त तांबडे यांनी आपल्या भाषणात सोलापूरची स्मार्ट सिटीत निवड झाली याची दीड वर्षापासून चर्चा फार झाली; पण काहीच दिसत नव्हते. आता प्रकल्प सुरू होत आहे ही बाब चांगली आहे. पोलीस खाते स्मार्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांनाही आता स्मार्ट होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी आपल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटीचे जास्तीत जास्त प्रकल्प मार्गी लावण्यावर भर राहील, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार शरद बनसोडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० स्मार्ट सिटीची संकल्पना मांडल्यावर मी काही सोलापूरच्या बाबतीत असे घडेल वाटले नव्हते. पण तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विविध प्रकल्प अहवाल तयार केल्याने पहिल्या २० शहरात सोलापूर नवव्या क्रमांकाने यादीत आले, याचा अभिमान वाटला. नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणारे प्रकल्प पहिल्यांदा मार्गी लावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले तर आभार कंपनीचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी मानले.--------------------------बापू तुम्ही जरा थांबा...मनपातील भाजप नगरसेवकांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या प्रकल्प शुभारंभाच्या निमित्ताने पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यामुळे हे दोघे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे भाषण करण्यासाठी उठल्यावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांना मध्येच थांबविले. बापू तुम्ही जरा थांबा, अगोदर मी बोलतो, असे म्हणून पालकमंत्री माईकच्या दिशेने निघाले. मालकाकडे स्मितहास्य व प्रश्नार्थक मुद्रेने पाहत बापू खाली बसले. दोनच मिनिटात त्यांनी आपले मनोगत संपविले. दोघांनीही नगरसेवक व नागरिकांना स्मार्ट होण्याची गरज असल्याचे नमूद केले. --------------------हिप्परगा, होटगी तलावांचा विकासखासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरचे मार्केटिंग करा, पर्यटनासाठी आलेल्या लोकांना विरंगुळा म्हणून हिप्परगा तलाव परिसर विकसित करा, अशी सूचना केली. हाच धागा पकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हिप्परगा तलाव परिसरात एमटीडीसीच्या माध्यमातून विकसित करण्याबाबत प्रस्ताव दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर होटगी तलाव परिसर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल विकसित करण्यात येणार आहे. पुस्तकाचे गाव म्हणून भिलार चर्चेत येते, मग देशातील पहिला मराठी शिलालेख आढळलेले हत्तरसंग कुडल गाव मागे का, असा सवाल देशमुख यांनी व्यक्त केला.