शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कुरुल ग्रामपंचायतीवर लांडे गटाचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:22 IST

कुरुल : मोहोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या कुरुल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहोळ पंचायत समीतीचे सदस्य जालिंदर लांडे यांच्या ...

कुरुल : मोहोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणाऱ्या कुरुल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोहोळ पंचायत समीतीचे सदस्य जालिंदर लांडे यांच्या गटाने १७ पैकी ११ जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. तर विरोधक अण्णासाहेब पाटील व लिंगदेव निकम गटानेही जोरदार लढत देत ६ जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायतीत शिरकाव केला.

गेल्या २० वर्षापासून या ग्रामपंचायतीवर जालिंदर लांडे गटाची एकहाती सत्ता आहे. प्रभाग क्रमांक चार व प्रभाग क्रमांक पाच मध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. परिणामत लांडे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. केचुआई परिवर्तन पॅनलचे प्रभाग तीन मधील दोन्ही उमेदवार फार कमी मतांनी पराभूत झाले. प्रभाग सहा मधून पॅनल प्रमुख लिंगदेव निकम यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

----

प्रभाग दोन मध्ये पॅनलप्रमुख जालिंदर लांडे यांनी जय जगदंबा आदर्श पॅनलच्या बालेकिल्ल्यात पूत्र सीताराम लांडे यांना पहिल्यांदाच गावपातळीवरच्या निवडणुकीत उतरवले होते. सीताराम लांडे यांनी यापूर्वी माजी महापौर ऍड .यू एन बेरिया यांच्या विरोधात २०० च्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग दोन मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना अवघ्या ९० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. या निवडणूकीत ते २९ मतांनी विजय झाला आहे .

---

विजयी उमेदवार : प्रभाग क्र.१: तानाजी गायकवाड (५१४), बाळासाहेब लांडे (५०४), अंजली गायकवाड (५१५).

प्रभाग क्रमांक २: सीताराम लांडे (३९३), मोहिनी घोडके (४४३) शिला माने (३८५). प्रभाग क्रमांक ३ : रोहिणी तगवाले (३३४), चंद्रकला पाटील (३४७).

प्रभाग क्रमांक ६ : सुभाष माळी (३३६), पांडुरंग जाधव (३५२), शंनू मुलानी (३७६),

अण्णासाहेब पाटील व लिंगदेव निकम यांच्या नेतृत्वाखालील जय केचुआई परिवर्तन पॅनेलने दोन प्रभागातील सहा जागांवर यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ४: गहिनीनाथ जाधव (४८१), रुक्मिणी माळी (४३५), कल्पना जाधव (४६९),

प्रभाग क्रमांक ५ : प्रकाश जाधव (४७०), संगीता शिंदे (४४४), कविता निकम (४१६) हे उमेदवार विजयी झाले.