शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

लांबोटी - सीना सेतू रस्ता उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:19 IST

अर्जुनसोडं-लांबोटी रस्ता डांबरीकरणाची मागणी लांबोटी : अर्जुनसोंड-लांबोटी रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता लांबोटी स्टँडवरून अर्जुनसोंडला जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. ...

अर्जुनसोडं-लांबोटी रस्ता डांबरीकरणाची मागणी

लांबोटी : अर्जुनसोंड-लांबोटी रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता लांबोटी स्टँडवरून अर्जुनसोंडला जाण्यासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरून सध्या उसाची वाहतूक होत आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे

सावळेश्वरमध्ये वाढली काटेरी झाडे

लांबोटी : सावळेश्वर ( ता. मोहोळ ) येथील राष्ट्रीय महामार्ग ते गावा दरम्यान रस्त्यालगत काटेरी झाडे वाढली आहेत. या झाडामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही काटेरी झाडे काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

डिकसळ पुलावरील संरक्षक पाइप गायब

वाळूज : डिकसळ ( ता. मोहोळ ) येथील भोगावती नदीवरील पुलाचे संरक्षक पाइप आक्टोबरमध्ये अतिवृष्टीत वाहून गेले आहेत. यामुळे भोगावती नदीला पूर आला होता. या पाण्यात संरक्षक पाइप आणि सिमेंट कठडे वाहून गेले आहेत. या पुलावरून वाहनांची वर्दळ सतत आहे. प्रसंगी पुलावरून एखादी दुर्घटना होऊ शकते. संरक्षक पाइप बसविण्याची मागणी शेतकरी आणि वाहनधारकामधून होत आहे.

वाळूज - धानोरे रस्ता झाला ओबड-धोबड

वाळूज : मोहोळ तालुक्यातील वाळूज-धानोरे रस्ता बऱ्याच दिवसांपासून ओबड-धोबड झाला आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागते. हा रस्ता मोहोळ आणि माढा तालुक्याला जोडणारा रस्ता आहे. सन १९७२ साली रोजगार हमी योजनेतून हा र्स्ता झाला होता. तेव्हापासून एकदाही ना खडीकरण ना डांबरीकरण झाले नाही. वाळूज येथील शेतकऱ्यांनी यापूर्वी तालुका हदीपर्यंत पडलेले खड्डे लोकवर्गणीतून बुजविले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपी वाढली आहे. हा रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी वाहनधारक, शेतकरी यांच्यातून होत आहे.

--

येलमवाडीकरांची स्मशानभूमीची मागणी

वाळूज : मोहोळ तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकाचे येलमवाडी हे गाव. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून या गाावाला स्मशानभूमी मिळालेली नाही. गावाकुसा लगत ओढयाच्या काठी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. या ठिकाणी रस्ताही नाही. काटेरी झाडे आडवी वाढलेली आहेत. या ठिकाणी पाणी आणि वीजदेखील नाही. गावासाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.