शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

By admin | Updated: July 13, 2014 01:34 IST

गुरुपौर्णिमा : अक्कलकोटमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रांग

अक्कलकोट : सद्गुरू ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’चा जयघोष करीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाखो भाविकांनी शनिवारी दर्शन घेतले़ गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रांग लागलेली होती़श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात पहाटे ४़३० वाजता काकडारती झाली़ त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले़ मंदिरापासून फत्तेसिंह चौकापर्यंत भाविकांची रांग लागली होती़ सकाळी ११़३० वाजता श्रींची आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला़ रात्री ८़३० वाजता शेजारती करण्यात आली़ भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून नियमित केले जाणारे अभिषेक रद्द करून नारळ, हार प्रसाद म्हणून देण्यात आला़ भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून विश्वस्त महेश इंगळे, सचिव सुभाष शिंदे, विलास फुटाणे, आत्माराम घाडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले़ भक्त निवासात भाविकांच्या प्रसादासाठी गणेश दिवाणजी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले़स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून दुपारी १२ वाजता खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, पुण्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे हृदय शल्यचिकित्सक श्री. व सौ. डॉ़ रणजित जगताप, सांधेरोपणतज्ज्ञ श्री. व सौ. डॉ़ हेमंत वाळणकर, डॉ़ वैजयंती लागू, जोशी यांच्या हस्ते श्रींना नैवेद्य दाखविण्यात आला़ दरम्यान, सर्व मान्यवरांचा मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ श्री स्वामी समर्थ मंदिर, समाधीमठ येथे विनायक खोबरे व सुनंदा खोबरे यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली़ गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी ८ ते १० दरम्यान स्वामी समर्थ सारामृताचे पारायण, १० ते ११ दरम्यान नामस्मरण व श्रीगुरुपूजा करण्यात आली़ नियोजित वेळेत लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़ यासाठी अध्यक्ष जन्मेजय भोसले, शाम मोरे, अभय खोबरे, अमोल भोसले, आप्पा हंचाटे यांच्यासह सेवेकरी मंडळींनी परिश्रम घेतले़ शिवपुरी परमसद्गुरु श्री गजानन महाराज संस्थेतर्फे राम गल्लीतील गुरुमंदिरात शुक्रवारी रात्रभर भारुड, कीर्तन कार्यक्रम पार पडला़ सकाळी ८ वाजता पालखी मिरवणूक निघाली़ त्याचा शुभारंभ व स्वामी समर्थ पादुकांची पूजा डॉ़ पुरुषोत्तम व डॉ़ गिरीजा राजीमवाले यांच्या हस्ते करण्यात आली़ या मिरवणुकीत आष्टाकासार, कल्लनिंबाळ, उस्मानाबाद, कुरुंदवाड, अहमदनगर, सोलापूर येथील भाविक सहभागी झाले होते़ तसेच शारदामाता प्रशालेचे विद्यार्थीही सहभागी होते़ विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयावर पथनाट्य सादर केले़ कार्यक्रमासाठी जितेंद्रकुमार जाजू, भूपतभाई व्होरा, मुकुंद कुलकर्णी, गोपीराव, औरंगाबादकर, शाम जाजू, अण्णा वाले यांनी परिश्रम घेतले़ गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व गुजरात या राज्यातील व पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी आलेल्या असंख्य भाविकांनी अक्कलकोट येथे येऊन श्रींचे दर्शन घेतले़ गेल्या दोन दिवसांपासून भक्तनिवास, यात्रीभुवन, मुरलीधर मंदिर आदी निवासस्थानाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती़ --------------------१८१ पोलिसांचा बंदोबस्तगुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन व पुणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर १८१ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता़ त्यात १२ फौजदार, तीन पोलीस निरीक्षक, ६५ सुरक्षा बल पोलीस, सीआरपीएफचे ५० पोलीस कर्मचारी, २० महिला पोलीस, स्ट्रायकिंग फोर्सचे १० कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक जाधव यांनी सांगितले़