शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

कुरनूर धरणातून रब्बीसाठी पुढील आठवड्यात पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:24 IST

या बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, व्यंकट मोरे यांच्यासह ...

या बैठकीला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, व्यंकट मोरे यांच्यासह इतर अधिकारी, सल्लागार समितीचे सदस्य व नदीकाठचे शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत संपूर्ण उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी अतिपावसामुळे कुरनूर धरण भरले होते. आजअखेर धरणामध्ये ९३ टक्के पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात धरणातून रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात येईल. त्या माध्यमातून धरणाखाली असणारे आठही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेतले जाणार आहेत. धरणातून २० ते २२ टक्के पाणी खाली सोडण्यात येणार आहे. दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाण्याचे नियोजन करण्यात येत असते.

तिन्ही नगरपालिकांतील पाण्याचा विचार करून नियोजन

दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट या तिन्ही नगरपालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून यासंदर्भात नियोजन केले गेले आहे. यावर्षी पाणी अजूनही नव्वद टक्क्यांच्या पुढे आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा तालुक्याच्या दृष्टीने चांगला राहील. गेल्यावर्षी अनेक बंधाऱ्यातून प्रचंड पाण्याची गळती होत होती. त्याची दुरुस्ती काही प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता कमी आहे. या निर्णयामुळे मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी, बबलाद, सांगवी, बणजगोळ, सिंदखेड हे सर्व बंधारे भरून घेतले जाणार आहेत. त्याचा फायदा हा नदीकाठच्या गावांना व रब्बी पिकांना होणार आहे, असे सांगण्यात आले.

फोटो

१०अक्कलकोट-बैठक

ओळी

अक्कलकोट येथे आयोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी व अधिकारी.