शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महान योद्धा जाणता राजा शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:38 IST

विधानसभा निवडणुकीत केवळ मेहनत, चिकाटी, जिद्दीमुळे प्रचंड इच्छाशक्तीमुळे, पराभूत मानसिकतेमध्ये गेलेल्या पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर काँग्रेस पक्षालादेखील पुनर्जीवन मिळाले. ...

विधानसभा निवडणुकीत केवळ मेहनत, चिकाटी, जिद्दीमुळे प्रचंड इच्छाशक्तीमुळे, पराभूत मानसिकतेमध्ये गेलेल्या पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर काँग्रेस पक्षालादेखील पुनर्जीवन मिळाले. ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अतिशय एकतर्फी झाले होते. प्रत्येकाला स्वत:ची सत्तास्थाने टिकविण्याची घाई झाली होती. जी सत्तास्थाने केवळ कृपाशीर्वादाने मिळाली होती. त्याबाबत कुठलीही कृतज्ञता न बाळगता, या सर्व स्वार्थी मंडळींनी कसलाही विचार न करता अतिशय कृतघ्नपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हा सर्व घटनाक्रम माझे आजारी असलेले वडील टीव्हीवर रोज पाहत होते. मी घरी आल्यानंतर वडिलांच्या जवळ त्यांची चौकशी करण्याकरिता गप्पा मारत असे. ते ‘एस काँग्रेस’पासूनचे कार्यकर्ते होते. त्यांनी हे जग सोडण्यापूर्वी माझा हात हातात घेऊन मला एकच गोष्ट सांगितली होती की, ‘आज शरद पवार अडचणीत असले तरी तू आयुष्यभर पवार साहेबांना सोडू नकोस.’ त्यावेळी त्यांना मी म्हणालो होतो की, ‘तुम्ही माझ्यावर दगाबाजीचे संस्कार केले नाहीत’ त्यामुळे, ‘तुम्ही सांगितले म्हणून नव्हे तर तुम्ही केलेल्या संस्कारामुळे मी कधीच पवारांना सोडणार नाही’. अर्थात मी पक्षाचा त्या अर्थाने लाभार्थी नाही; परंतु सार्वजनिक जीवनामध्ये आज जे काही माझे नाव झाले, सन्मान मिळाला, पदे मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, मानसन्मान मिळाला, स्वतःची ओळख निर्माण करता आली, ते सर्व केवळ आणि केवळ ‘शरद पवार’ नावाची रॉयल्टी मोफत मिळत होती म्हणून हे शक्य झाले.

गुणवत्तापूर्ण ध्येयासक्त कार्यकर्त्यांची संख्या दुर्मीळ झाली आहे. राजकीय क्षेत्राचे परिमाण बदलल्यामुळे, अतिशय भंपक व तकलादू कार्यकर्त्यांची गर्दी वाढून एकूणच राजकीय व्यवस्थेचे उद्दिष्ट कलुषित होत आहे. त्यामुळे अगाध दूरदृष्टी असलेल्या जबाबदार नेत्यांकडून आजच्या तरुण पिढीला विशेष अपेक्षा आहे. वयाच्या ८० व्या वर्षी कितीही कठीण प्रसंग आला तरीही खचून न जाता निर्धाराने व कठोर परिश्रमाने अशा अडचणीच्या परिस्थितीवर मात करता येऊ शकते. हा अत्यंत दूरगामी संस्कार आपण आजच्या तरुण पिढीवर केला आहे. कुठल्याही सत्तेपेक्षा आपण दिलेला हा संस्कार लाखमोलाचा आहे. देश घडविणारा व आजच्या तरुण पिढीला दिशा देणारा हा संस्कार कुठल्याही शालेय अभ्यासक्रमातून शिकवण्याची यापुढे आवश्यकता भासणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संपुष्टात येऊन फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना यशवंतराव चव्हाणांच्या या मानसपुत्राने अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात हा महाराष्ट्र वाचवणारा विचार जिवंत ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही बाब महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जावी, एवढे आपले कर्तृत्व ऐतिहासिक व महान आहे.

धन्यवाद

आपला विश्वासू कार्यकर्ता

- उमेश पाटील