शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

महान योद्धा जाणता राजा शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:38 IST

विधानसभा निवडणुकीत केवळ मेहनत, चिकाटी, जिद्दीमुळे प्रचंड इच्छाशक्तीमुळे, पराभूत मानसिकतेमध्ये गेलेल्या पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर काँग्रेस पक्षालादेखील पुनर्जीवन मिळाले. ...

विधानसभा निवडणुकीत केवळ मेहनत, चिकाटी, जिद्दीमुळे प्रचंड इच्छाशक्तीमुळे, पराभूत मानसिकतेमध्ये गेलेल्या पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर काँग्रेस पक्षालादेखील पुनर्जीवन मिळाले. ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अतिशय एकतर्फी झाले होते. प्रत्येकाला स्वत:ची सत्तास्थाने टिकविण्याची घाई झाली होती. जी सत्तास्थाने केवळ कृपाशीर्वादाने मिळाली होती. त्याबाबत कुठलीही कृतज्ञता न बाळगता, या सर्व स्वार्थी मंडळींनी कसलाही विचार न करता अतिशय कृतघ्नपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हा सर्व घटनाक्रम माझे आजारी असलेले वडील टीव्हीवर रोज पाहत होते. मी घरी आल्यानंतर वडिलांच्या जवळ त्यांची चौकशी करण्याकरिता गप्पा मारत असे. ते ‘एस काँग्रेस’पासूनचे कार्यकर्ते होते. त्यांनी हे जग सोडण्यापूर्वी माझा हात हातात घेऊन मला एकच गोष्ट सांगितली होती की, ‘आज शरद पवार अडचणीत असले तरी तू आयुष्यभर पवार साहेबांना सोडू नकोस.’ त्यावेळी त्यांना मी म्हणालो होतो की, ‘तुम्ही माझ्यावर दगाबाजीचे संस्कार केले नाहीत’ त्यामुळे, ‘तुम्ही सांगितले म्हणून नव्हे तर तुम्ही केलेल्या संस्कारामुळे मी कधीच पवारांना सोडणार नाही’. अर्थात मी पक्षाचा त्या अर्थाने लाभार्थी नाही; परंतु सार्वजनिक जीवनामध्ये आज जे काही माझे नाव झाले, सन्मान मिळाला, पदे मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, मानसन्मान मिळाला, स्वतःची ओळख निर्माण करता आली, ते सर्व केवळ आणि केवळ ‘शरद पवार’ नावाची रॉयल्टी मोफत मिळत होती म्हणून हे शक्य झाले.

गुणवत्तापूर्ण ध्येयासक्त कार्यकर्त्यांची संख्या दुर्मीळ झाली आहे. राजकीय क्षेत्राचे परिमाण बदलल्यामुळे, अतिशय भंपक व तकलादू कार्यकर्त्यांची गर्दी वाढून एकूणच राजकीय व्यवस्थेचे उद्दिष्ट कलुषित होत आहे. त्यामुळे अगाध दूरदृष्टी असलेल्या जबाबदार नेत्यांकडून आजच्या तरुण पिढीला विशेष अपेक्षा आहे. वयाच्या ८० व्या वर्षी कितीही कठीण प्रसंग आला तरीही खचून न जाता निर्धाराने व कठोर परिश्रमाने अशा अडचणीच्या परिस्थितीवर मात करता येऊ शकते. हा अत्यंत दूरगामी संस्कार आपण आजच्या तरुण पिढीवर केला आहे. कुठल्याही सत्तेपेक्षा आपण दिलेला हा संस्कार लाखमोलाचा आहे. देश घडविणारा व आजच्या तरुण पिढीला दिशा देणारा हा संस्कार कुठल्याही शालेय अभ्यासक्रमातून शिकवण्याची यापुढे आवश्यकता भासणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संपुष्टात येऊन फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना यशवंतराव चव्हाणांच्या या मानसपुत्राने अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात हा महाराष्ट्र वाचवणारा विचार जिवंत ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही बाब महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जावी, एवढे आपले कर्तृत्व ऐतिहासिक व महान आहे.

धन्यवाद

आपला विश्वासू कार्यकर्ता

- उमेश पाटील