शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणी ५ टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

अक्कलकोट : तालुक्यात तूर, उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या खरीप पिकाची पेरणी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ६२ ...

अक्कलकोट : तालुक्यात तूर, उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या खरीप पिकाची पेरणी ९५ टक्के पूर्ण झाली आहे. आतापर्यंत ६२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात ५२०० हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे.

सलग दोन वर्षे पावसाने साथ दिल्याने बळीराजा सुखावला आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही सुरुवातीपासून पावसाने साथ दिल्याने जून महिन्यात मोठ्या प्रमाणात खरीप पिकाची पेरणी झाली आहे. खरीप पिकामध्ये प्रामुख्याने तूर, उडीद, मूग, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन आदी प्रकारच्या पिकाची पेरणी झाली आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शेतक-यांना उत्पन्न समाधानकारक लाभणार आहे. बारा दिवस पाऊस झाल्याने पिके डोलू लागली आहेत.

विशेषतः वागदरी, घोळसगाव, किरनळ्ळी, चुंगी, किणी, किणीवाडी, हन्नूर, खैराट, गोगाव, भुरीकवठे या भागात सर्वाधिक सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे. ५२०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

----

तूर, उडदाची लागवड सर्वाधिक

तूर-२८ हजार हेक्टर, उडीद-१५ हजार, मूग-६ हजार, सोयाबीन-५ हजार २५० हेक्टर, सूर्यफूल-२ हजार ३००, भुईमूग-१ हजार २०० आदी प्रकारच्या मिळून तब्बल ६२ हजार हेक्टर खरीप पिकाची पेरणी झाली आहे. एकूण ६५ आरक्षित क्षेत्रापैकी ६२ हजार क्षेत्रावर म्हणजेच ९५ टक्के पेरणी झाली आहे. तडवळ, करजगी भागात उशिरा व पुरेसा पाऊस न झाल्याने उशिरा खरीप पेरणी होत आहे.

---

तालुक्यात यंदाही समाधानकारक पाऊस झाला आहे. सध्या खुरपणी, कोळपणीला पिके आली असून शेतक-यांनी जमीन तणविरहित स्वच्छ ठेवण्याचे काम करावे. यामुळे रोगराई होणार नाही. याची काळजी घ्यावी. सोयाबीन वाढ चांगली होत आहे. उडीद फुलो-यात आहे.

- सूर्यकांत वडखेलकर

तालुका कृषी अधिकारी