शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

कोयनेतून कर्नाटकला मिळणार आणखी १.७० टीएमसी पाणी

By admin | Updated: April 17, 2017 18:44 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर / विजयपूर दि १७ : सोलापूर: कर्नाटकातील विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे कोयना धरणातून आणखी १़७० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने सीमावर्ती भागातील जनतेला दिलासा मिळाल्याचे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़आलमट्टी धरण क्षेत्रावर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाटील यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़महाराष्ट्राला पाणी सोडण्याची हमी देऊनही कर्नाटक सरकारने पूर्ण केली नाही़ गेल्यावर्षीही वारंवार विनंती करूनही कर्नाटकने महाराष्ट्राच्या सोलापूर-सांगली या जिल्ह्यांसाठी पाणी न सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाचे सीमावर्ती भागातून स्वागत होत आहे़यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने कोयना आणि वारणा जलाशयातून २.३६ टीएमसी पाणी सोडले आहे. या पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू आहे. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकाने भीमा किंवा हिरेपडसलगी योजनेतून पाणी देण्याची अट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घातली होती़ या अटीची पूर्तता कर्नाटक सरकारने केली नसल्याकडे लक्ष वेधले असता जलसंपदा मंत्री पाटील यांनी उत्तर देणे सोयीस्करपणे टाळले़आता येणारे जादा १़७० टीएमसी पाणी आलमट्टी धरणात पोहोचेल. त्यावेळी गलगली येथील बॅरेजमधून ते पाणी कोल्हार बॅरेजला पुरविण्यात येईल. त्यामुळे विजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील दुष्काळग्रस्त गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकने शब्द न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़