शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
4
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
5
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
6
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
7
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
8
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
9
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
10
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
11
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
12
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
13
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
14
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
15
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
16
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
17
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
18
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
19
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
20
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले

कोयनेतून कर्नाटकला मिळणार आणखी १.७० टीएमसी पाणी

By admin | Updated: April 17, 2017 18:44 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर / विजयपूर दि १७ : सोलापूर: कर्नाटकातील विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे कोयना धरणातून आणखी १़७० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने सीमावर्ती भागातील जनतेला दिलासा मिळाल्याचे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़आलमट्टी धरण क्षेत्रावर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाटील यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़महाराष्ट्राला पाणी सोडण्याची हमी देऊनही कर्नाटक सरकारने पूर्ण केली नाही़ गेल्यावर्षीही वारंवार विनंती करूनही कर्नाटकने महाराष्ट्राच्या सोलापूर-सांगली या जिल्ह्यांसाठी पाणी न सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाचे सीमावर्ती भागातून स्वागत होत आहे़यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने कोयना आणि वारणा जलाशयातून २.३६ टीएमसी पाणी सोडले आहे. या पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू आहे. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकाने भीमा किंवा हिरेपडसलगी योजनेतून पाणी देण्याची अट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घातली होती़ या अटीची पूर्तता कर्नाटक सरकारने केली नसल्याकडे लक्ष वेधले असता जलसंपदा मंत्री पाटील यांनी उत्तर देणे सोयीस्करपणे टाळले़आता येणारे जादा १़७० टीएमसी पाणी आलमट्टी धरणात पोहोचेल. त्यावेळी गलगली येथील बॅरेजमधून ते पाणी कोल्हार बॅरेजला पुरविण्यात येईल. त्यामुळे विजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील दुष्काळग्रस्त गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकने शब्द न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़