शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

‌उजनीचा पाणी प्रश्न पेटला; उपरीत आंदोलनाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST

पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने कदापिही करू नये. सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तयार आहे. त्याची सुरुवात ...

पाणी नेण्याचा प्रयत्न सरकारने कदापिही करू नये. सरकारला जशास तसे उत्तर देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तयार आहे. त्याची सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित अध्यादेश काढावा अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अतुल खुपसे यांनी दिला आहे. यावेळी माऊली हळणवर, दीपक वाडदेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

इंदापूर-सोलापूरकरांची भांडणे लावली

इंदापूर तालुक्यातील २२ गावे १९७१ पासून पाण्यासाठी झगडत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्या शेतकऱ्यांसाठी नीरा डावा कालवा आणि खडकवासला धरणातून तरतूद करून ऊस लावण्याची परवानगी दिली होती. मग ५० वर्षानंतरदेखील तिथले शेतकरी पाण्यासाठी झगडत आहेत. तर त्यांना तरतूद केलेले पाणी गेले कुठे..? असा सवाल करुन त्यांनी केवळ इंदापूर व सोलापूरकरांची भांडणे लावल्याचे महापाप बारामतीकरांनी केले आहे. याची किंमत त्यांना येणाऱ्या काळात मोजावी लागेल, असे अतुल खुपसे-पाटील यांनी सांगितले.

फोटो ::::::::::::::

उपरी (ता. पंढरपूर) येथे टायर जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करताना उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी.