शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परतीचा पाऊस चांगलाच बरसला..ओढे-नाले तुंडूब वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:26 IST

मागील दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसाच पाऊस यावर्षी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाळ्यातील पहिले एक-दोन महिने ...

मागील दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसाच पाऊस यावर्षी होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाळ्यातील पहिले एक-दोन महिने अधूनमधून समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पाऊस अचानक गायब झाला. जिल्ह्याला वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रातही समाधानकारक पाऊस न झाल्याने उजनी अद्याप १०० टक्केसाठी तहानलेले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने पुनरागमन केले.

गेल्या चार दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. या परतीच्या पावसाचा ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, ज्वारी लागवडीसाठी हा पाऊस उपयुक्त असून शेकडो हेक्टर पिकांना जीवदान मिळणार आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने पंढरपूर शहरासह भंडीशेगाव, वाखरी, गादेगाव, पळशी, सुपली, टाकळी, कासेगाव, भटुंबरे, गुरसाळे आदी गावांत शेतजमिनी व सखल भागात पाणी साठले होते. काही लहान-मोठे ओढे भरून वाहत होते. रस्त्यावरील माती वाहून गेल्याने खड्ड्यातील रस्ते आणखी खड्ड्यांत गेल्याचे दिसत होते. मात्र, या पावसाने बळीराजा सुखावला आहे.

.............

प्रतीक्षा उजनीच्या शंभरीची

गेले दोन वर्षे ऑगस्टमध्ये उजनी धरण १०० टक्के भरून नदीला पूर आला होता. यावर्षी मात्र पावसाळा संपत आला तरी उजनी धरण ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान अडकले आहे. उजनी धरण भरल्यास पंढरपूर तालुक्यातील हजारो हेक्टर बागायती क्षेत्र, फळबागा, भाजीपाला, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे आता तालुक्यात जसा परतीचा पाऊस दमदार पडत आहे, तसाच पाऊस उजनीच्या कार्यक्षेत्रात पडून उजनी धरण लवकरात लवकर १०० टक्के भरावे, याकडे तालुक्यातील शेतकरी नागरिकांचे लक्ष लागले आहे.