शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पाऊस मनसोक्त बरसला.. ऊस सोडून सर्व पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. यावर्षी जुलै महिन्यात पिकांना पाणी लागले ...

मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. यावर्षी जुलै महिन्यात पिकांना पाणी लागले आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने खरीप पेरण्या झाल्या. आर्द्रा नक्षत्रात १० (२८ जून ते ६ जुलै) दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे खरीप पिके माना टाकू लागली होती. मात्र ७ जुलैला सुरू झालेला पाऊस थांबण्यास तयार नाही.

सलग १५ दिवस दररोज पाऊस पडत आहे.

गेल्या आठवड्यात दुपारपर्यंत कडक उन्ह पडत होते व दुपारनंतर पाऊस पडत होता; मात्र गेल्या चार दिवसांपासून दररोज सतत पाऊस पडत आहे. दररोज पडणाऱ्या पावसाचे पाणी शोषून घेण्याची क्षमता जमिनीची राहिली नाही. त्यामुळे मूग, उडीद, तूर, सोयाबीन, मका, भुईमूग, मिरची, घेवडा, बाजरी तसेच इतर पिकांतील पाणी हटत नाही. यामुळे एकही पीक व्यवस्थित राहिले नाही. सध्या ऊस चांगला दिसत असला तरी ऊन नसल्याने उसाची वाढ ही थांबली आहे. असाच पाऊस काही दिवस राहिल्यास उसाचेही नुकसान होईल असे शेतकरी सांगतात.

गतवर्षी जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस पडला होता. यामुळे पिकांचे नुकसान झाले नव्हते. सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तसेच ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके पाण्यात गेली होती. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी जुलै महिन्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

---

जनावरे आजारी पडतील

शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. तो बराच वेळ पडत होता. गोठा नसलेल्या जनावरांखालचा चिखल मागील १५ दिवसात हटलेला नाही. या पावसामुळे पिके तर गेलीच शिवाय जनावरेही आजारी पडतील असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

- विहिरी तुडुंब झाल्या असून सगळीकडे पाझर सुरू झाले आहेत. ओढे वाहू लागले आहेत. मात्र लहान- मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीन पाण्याची गरज आहे.

- उत्तर तालुक्यात २३ जुलैपर्यंत २०७.८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३१४.८ मि. मी. पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १५१.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

----

पावसाने उघडीप दिली व ऊन पडले तर काही पिके वाचतील अन्यथा एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. मागीलवर्षी प्रमाणेच याहीवर्षी खरीप व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी.

- अमोल पाटील

----