शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस मनसोक्त बरसला.. ऊस सोडून सर्व पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. यावर्षी जुलै महिन्यात पिकांना पाणी लागले ...

मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली होती. यावर्षी जुलै महिन्यात पिकांना पाणी लागले आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने खरीप पेरण्या झाल्या. आर्द्रा नक्षत्रात १० (२८ जून ते ६ जुलै) दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे खरीप पिके माना टाकू लागली होती. मात्र ७ जुलैला सुरू झालेला पाऊस थांबण्यास तयार नाही.

सलग १५ दिवस दररोज पाऊस पडत आहे.

गेल्या आठवड्यात दुपारपर्यंत कडक उन्ह पडत होते व दुपारनंतर पाऊस पडत होता; मात्र गेल्या चार दिवसांपासून दररोज सतत पाऊस पडत आहे. दररोज पडणाऱ्या पावसाचे पाणी शोषून घेण्याची क्षमता जमिनीची राहिली नाही. त्यामुळे मूग, उडीद, तूर, सोयाबीन, मका, भुईमूग, मिरची, घेवडा, बाजरी तसेच इतर पिकांतील पाणी हटत नाही. यामुळे एकही पीक व्यवस्थित राहिले नाही. सध्या ऊस चांगला दिसत असला तरी ऊन नसल्याने उसाची वाढ ही थांबली आहे. असाच पाऊस काही दिवस राहिल्यास उसाचेही नुकसान होईल असे शेतकरी सांगतात.

गतवर्षी जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस पडला होता. यामुळे पिकांचे नुकसान झाले नव्हते. सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तसेच ऑक्टोबर महिन्यात संततधार व अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिके पाण्यात गेली होती. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी जुलै महिन्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

---

जनावरे आजारी पडतील

शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. तो बराच वेळ पडत होता. गोठा नसलेल्या जनावरांखालचा चिखल मागील १५ दिवसात हटलेला नाही. या पावसामुळे पिके तर गेलीच शिवाय जनावरेही आजारी पडतील असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

- विहिरी तुडुंब झाल्या असून सगळीकडे पाझर सुरू झाले आहेत. ओढे वाहू लागले आहेत. मात्र लहान- मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीन पाण्याची गरज आहे.

- उत्तर तालुक्यात २३ जुलैपर्यंत २०७.८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३१४.८ मि. मी. पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १५१.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

----

पावसाने उघडीप दिली व ऊन पडले तर काही पिके वाचतील अन्यथा एकही पीक शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही. मागीलवर्षी प्रमाणेच याहीवर्षी खरीप व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी.

- अमोल पाटील

----