शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

१४ जिल्ह्यांना तीन वर्षांत फळ पीकविम्याचा लाभ मिळणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:22 IST

सोलापूर : हवामानातील बदलामुळे फळबागांचे नुकसान झाले तरी फळ पीकविम्याचा लाभ सोलापूरसह १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही, असेच जाचक ...

सोलापूर : हवामानातील बदलामुळे फळबागांचे नुकसान झाले तरी फळ पीकविम्याचा लाभ सोलापूरसह १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही, असेच जाचक निकष नव्या पंतप्रधान विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. दुष्काळी स्थितीमुळे नुकसान झाल्यास यापुढच्या तीन वर्षांत पीकविमा फळपीक उत्पादकांना मिळणार नाही, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी यापूर्वी शासन दरवर्षी नवीन निकष (ट्रिगर) ठरवणारा अध्यादेश काढत होते. यावर्षी शासनाने तीन वर्षांसाठी एकच अध्यादेश जारी केला आहे. त्यात फळ पिकाच्या नुकसानभरपाईसाठीचे जुने निकष बदलून नवीन निकष निश्चित केले आहेत. विमा संरक्षण देण्याचा कालावधीही कमी केला आहे. त्यामुळे नवीन फळ पीकविमा योजनेचा शासन आदेश उत्पादकांना तारणारा नाही तर जाचक अटी आणि निकष लावून नुकसानभरपाईपासून वंचित ठेवणारा आहे. दुष्काळी स्थिती अथवा पावसाचा पडणारा खंड यापूर्वी नुकसानभरपाईसाठी ग्राह्य धरला जात होता. नव्या आदेशात पावसाचा खंड हा निकषच काढून टाकला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीमुळे फळबागा करपून गेल्यास विमा कंपन्यांकडे दावा करता येणार नाही. दुुष्काळ आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तींनाही शेतकरी नेहमीच तोंड देत असतात. आता त्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मागता येणार नाही.

------

काय होते जुने निकष

गतवर्षीच्या पीकविमा योजनेत सलग २० ते ३० दिवस पावसाचा खंड असल्यास डाळिंबासाठी किमान १६,५०० रुपये तर ६० दिवस सलग पावसाचा खंड असल्यास किमान ३८,५०० रुपये हेक्टरी नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद होती. एका दिवसात ४५ मि.मी. ते ६० मि.मी. पाऊस झाला तर किमान ११ हजार तर एका दिवसात ९० मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास किमान ६६ हजार रुपये भरपाई मिळत होती.

नवीन जाचक निकष

पावसाचा सलग खंड पडल्यास, गारपीट झाल्यास विमा कंपनी नुकसानभरपाईकडे दावा करता येणार नाही. मात्र, सलग ५ दिवस दररोज २५ मिमी व ८५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता राहिल्यास हेक्टरी किमान १० हजार ४०० तर किमान ३२ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. अतिवृष्टीचा कालावधी, पावसाचे प्रमाण वाढल्यास भरपाईची रक्कम ५२ हजारांपर्यंत वाढू शकते.

ही आहे जिल्ह्याची वस्तुस्थिती

यंदा सन २००० मध्ये जिल्ह्यात १५ ऑक्टोबरअखेर ५२६ मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत ७४८ मि.मी. पाऊस झाला असून, मागील दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या ९१ महसूल मंडळांमध्ये हे एकदाही सलग पाच दिवस दररोज पंचवीस मि.मी. पावसाची नोंद नाही. एकाच दिवसात ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकही शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार नाही. तीन वर्षे हीच स्थिती सहन करावी लागणार आहे.