शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

१४ जिल्ह्यांना तीन वर्षांत फळ पीकविम्याचा लाभ मिळणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:22 IST

सोलापूर : हवामानातील बदलामुळे फळबागांचे नुकसान झाले तरी फळ पीकविम्याचा लाभ सोलापूरसह १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही, असेच जाचक ...

सोलापूर : हवामानातील बदलामुळे फळबागांचे नुकसान झाले तरी फळ पीकविम्याचा लाभ सोलापूरसह १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही, असेच जाचक निकष नव्या पंतप्रधान विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. दुष्काळी स्थितीमुळे नुकसान झाल्यास यापुढच्या तीन वर्षांत पीकविमा फळपीक उत्पादकांना मिळणार नाही, अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी यापूर्वी शासन दरवर्षी नवीन निकष (ट्रिगर) ठरवणारा अध्यादेश काढत होते. यावर्षी शासनाने तीन वर्षांसाठी एकच अध्यादेश जारी केला आहे. त्यात फळ पिकाच्या नुकसानभरपाईसाठीचे जुने निकष बदलून नवीन निकष निश्चित केले आहेत. विमा संरक्षण देण्याचा कालावधीही कमी केला आहे. त्यामुळे नवीन फळ पीकविमा योजनेचा शासन आदेश उत्पादकांना तारणारा नाही तर जाचक अटी आणि निकष लावून नुकसानभरपाईपासून वंचित ठेवणारा आहे. दुष्काळी स्थिती अथवा पावसाचा पडणारा खंड यापूर्वी नुकसानभरपाईसाठी ग्राह्य धरला जात होता. नव्या आदेशात पावसाचा खंड हा निकषच काढून टाकला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीमुळे फळबागा करपून गेल्यास विमा कंपन्यांकडे दावा करता येणार नाही. दुुष्काळ आणि गारपीट या नैसर्गिक आपत्तींनाही शेतकरी नेहमीच तोंड देत असतात. आता त्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मागता येणार नाही.

------

काय होते जुने निकष

गतवर्षीच्या पीकविमा योजनेत सलग २० ते ३० दिवस पावसाचा खंड असल्यास डाळिंबासाठी किमान १६,५०० रुपये तर ६० दिवस सलग पावसाचा खंड असल्यास किमान ३८,५०० रुपये हेक्टरी नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद होती. एका दिवसात ४५ मि.मी. ते ६० मि.मी. पाऊस झाला तर किमान ११ हजार तर एका दिवसात ९० मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास किमान ६६ हजार रुपये भरपाई मिळत होती.

नवीन जाचक निकष

पावसाचा सलग खंड पडल्यास, गारपीट झाल्यास विमा कंपनी नुकसानभरपाईकडे दावा करता येणार नाही. मात्र, सलग ५ दिवस दररोज २५ मिमी व ८५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता राहिल्यास हेक्टरी किमान १० हजार ४०० तर किमान ३२ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. अतिवृष्टीचा कालावधी, पावसाचे प्रमाण वाढल्यास भरपाईची रक्कम ५२ हजारांपर्यंत वाढू शकते.

ही आहे जिल्ह्याची वस्तुस्थिती

यंदा सन २००० मध्ये जिल्ह्यात १५ ऑक्टोबरअखेर ५२६ मि.मी. पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत ७४८ मि.मी. पाऊस झाला असून, मागील दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या ९१ महसूल मंडळांमध्ये हे एकदाही सलग पाच दिवस दररोज पंचवीस मि.मी. पावसाची नोंद नाही. एकाच दिवसात ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकही शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरणार नाही. तीन वर्षे हीच स्थिती सहन करावी लागणार आहे.