शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कारीत नागरी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:21 IST

कारी : उस्मानाबाद जिल्ह्यात नुकताच समावेश झालेल्या कारीत सेवा सुविधांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे गावाच्या आरोग्याचा प्रश्न ...

कारी : उस्मानाबाद जिल्ह्यात नुकताच समावेश झालेल्या कारीत सेवा सुविधांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे गावाच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गावातील हनुमान मंदिर, खिंड चौक भागातील गटारी तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावात घाणीचे साम्राज्य आहे. डास व साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. वेशीतून गटारीचे पाणी वाहत आहे. परिणामी दुर्गंधी पसरून डासांची निर्मिती झाली आहे. गावात खिंड भागासोबतच अनेक ठिकाणी गटारी बुजलेल्या आहेत. गटारी तुंबण्याचा प्रश्न कचऱ्यामुळेच निर्माण होत आहे. गावातील कचरा हा प्रश्न गांभीर्याचा ठरला आहे. कचरा कुंडीची नितांत गरज असून तशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गादेकर यांनी मागील बैठकीत गटारी व स्वच्छतेबाबत विषय मांडला होता. परंतु महिना कालावधी लोटला तरी स्वच्छता होत नसल्याचे गादेकर यांनी सांगितले.

---

१६ एप्रिल रोजी उपोषणाची तयारी केली आहे. गावातील नागरी समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात. या मागण्यांबाबत ग्रामपंचायतीकडे मागणी केली असून तसे निवेदन त्यांना दिले आहे.

- अमोल जाधव

सामाजिक कार्यकर्ते

---

गटारीच्या दुरुस्तीसाठी लागणारे सर्व साहित्य आणले असून लवकरच काम पूर्ण केले जाणार आहे.

- अनंत सोनटक्के

ग्रामसेवक, कारी

---

फोटो : १४ कारी

तुंबलेल्या गटारींमुळे कारी येथे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.