शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अपूर्ण कामाची धूळ देतेय अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

दीड वर्षांपूर्वी श्रीसंत एकनाथ महाराज पालखी मार्गातून करकंबपासून नेमतवाडीकडे उजनी कालव्यापर्यंत साधारण अडीच कि.मी. डांबरीकरणाचे काम झाले आहे; परंतु ...

दीड वर्षांपूर्वी श्रीसंत एकनाथ महाराज पालखी मार्गातून करकंबपासून नेमतवाडीकडे उजनी कालव्यापर्यंत साधारण अडीच कि.मी. डांबरीकरणाचे काम झाले आहे; परंतु अडीच कि.मी. अंतराच्या रस्त्यावर मध्येच डांबरीकरणाचे काम दीड वर्षांपासून अपुरे ठेवण्याचा प्रताप संबंधित ठेकेदारांनी केला आहे. याचा नाहक त्रास वाहनचालक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मागील दीड वर्षांपासून काम अपुरे असताना याकडे ठेकेदारासह संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रवाशांमधून उलट-सुलट चर्चा

करकंब ते नेमतवाडी हा रस्ता अकलूजला जोडलेला असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची व प्रवाशांची मोठी रहदारी असते.

मागील आठवड्यातच रस्त्यावरून मोठे वाहन वेगाने गेल्यामुळे अपुऱ्या कामाच्या ठिकाणी धुराच्या पसरलेल्या लोटामुळे मोटरसायकल चालकाला समोरून येणारा ट्रॅक्टर न दिसल्यामुळे मोटरसायकल चालक आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. दैव बलवत्तर म्हणून मोटरसायकल चालक केवळ गंभीर जखमी झाला. या अपघाताला नेमके जबाबदार कोण, याबाबत प्रवाशांमधून उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

कोट :::::::::::::::::::::::::

मागील दीड वर्षांपासून अपुऱ्या राहिलेल्या रस्त्याच्या कामामुळे अपघात घडू लागले आहेत. काम त्वरित पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरू.

-राजू शेटे

प्रवासी

कोट :::::::::::::::::::

संबंधित अपुऱ्या रस्त्याचे काम १० ते १५ दिवसांत पूर्ण करू, तोपर्यंत संबंधित ठेकेदारास अपुऱ्या कामावर पाणी मारण्याचे सांगू, जेणेकरून प्रवाशांना अडचण निर्माण होणार नाही.

- हनुमंत बागल

उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर