शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

Interview; देशात देशविरोधी-संस्कृतीविरोधी शक्ती बाहेरच्यांनी पोसून ठेवलेल्या आहेत : किशोरजी व्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:17 IST

गोपालकृष्ण मांडवकर  आचार्य किशोरजी व्यास यांचा सोलापुरात कार्यक्रम सुरु असतानाच तिकडे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. धर्म-अध्यात्मासोबतच देशातील सध्यस्थितीबद्दल भाष्य ...

ठळक मुद्देभारतीय संस्कृतीचे मूळ वेदात आहे. तो टिकून राहावा यासाठी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानने ३४ वेद विद्यालये देशभर स्थापन केलीत - किशोरजी व्यासराममंदिर होणे नितांत आवश्यक आहे. निर्मितीच्या कामात आधीपासून ज्यांनी भाग घेतला त्यांच्याकडूनच होणे आवश्यक - किशोरजी व्यास

गोपालकृष्ण मांडवकर 

आचार्य किशोरजी व्यास यांचा सोलापुरात कार्यक्रम सुरु असतानाच तिकडे जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. धर्म-अध्यात्मासोबतच देशातील सध्यस्थितीबद्दल भाष्य करणाºया या संताने हल्ल्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. देशातील युवा वर्गाकडूनही त्यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीत अपेक्षा व्यक्त केल्या. 

प्रश्न : देशातील अंतर्गत सुरक्षेसंदर्भात आपणास काय वाटते?उत्तर : देशात सुशिक्षित वर्ग वाढला हे खरे आहे, मात्र यातील एका वर्गाच्या मनात राष्टÑविरोधी भावना निर्माण करण्यात आल्या आहेत. देशातील अध्यात्म आणि संस्कृती भिन्न असली तरी देशाचे संरक्षण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे. त्यात मतभेद नको. तिकडे सैनिकांवर हल्ला झाल्यावर टिष्ट्वटरवर पडलेल्या आनंदाच्या आणि अभिनंदनाच्या पोस्ट पाहून मी बेचैन झालो. याचा अर्थ देशात देशविरोधी-संस्कृतीविरोधी शक्ती बाहेरच्यांनी पोसून ठेवलेल्या आहेत, हे स्पष्ट दिसते. 

प्रश्न : हे कसे रोखायला हवे?उत्तर : देशातील एक सुशिक्षित वर्ग परक्यांचा धार्जिणा आहे. तो अशी कामे करतो. त्यामुळे राष्टÑावर निष्ठा असलेल्या शक्तींनीच समर्थ व्हावे. उघडपणे वैचारिक छात्रवृत्ती स्वीकारावी. या निष्ठावानांनी अशा विचारांचे साधार खंडन करावे. राजीव मल्होत्रा, डेव्हिड फ्राऊली, सुब्रह्मण्यम स्वामी, चारुदत्त आफळे ही मंडळी उत्तम काम करीत आहेत. युवा पिढीने व्यसनांपासून दूर राहावे. आपले जीवन आपल्यासाठी नसून परिवार, समाज, मोठ्या ध्येयाकरिता असल्याचा भाव रुजावा आणि सेवावृत्ती वाढावी. 

प्रश्न : अध्यात्म आणि मेडिटेशनमधून यावर मार्ग कसा शोधता येईल ?उत्तर : अलीकडे सर्वांचे मन सैरभैर झाले आहे. मन एकाग्र असेल तर तणाव राहत नाही. अध्यात्माचा संबंध मनाशी व त्या अनुषंगाने देहाशी असतो. मेडिटेशनमुळे मनाची एकाग्रता वाढते, तणाव दूर होतो. योग हे अध्यात्माचे अंगच. अलीकडेच रात्रंदिवस धावपळ व असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढली आहे. या स्थितीत अध्यात्माला अर्थात योगाला पर्याय नाही. 

राममंदिर व्हावेच राममंदिर होणे नितांत आवश्यक आहे. निर्मितीच्या कामात आधीपासून ज्यांनी भाग घेतला त्यांच्याकडूनच होणे आवश्यक आहे. मात्र आक्रस्ताळेपणा करून चालणार नाही. विद्यमान सरकार अनुकूल आहे. सुप्रिम कोर्टाकडून आम्हाला आशा होती. मात्र त्यांनी विलंब केला आहे. तरीही काही महिने प्रतीक्षा करायला हवी.

वेदांग, वेदार्थ आणि वेदांतभारतीय संस्कृतीचे मूळ वेदात आहे. तो टिकून राहावा यासाठी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानने ३४ वेद विद्यालये देशभर स्थापन केलीत. या सर्व विद्यालयांचे केंद्रीय महाविद्यालय आळंदीत सुरू करीत आहोेत. वेदांग, वेदार्थ आणि वेदांत अशा तीन अंगांचे प्रशिक्षण यात मिळेल. तिथे संशोधनकार्यही चालेल. लोकांच्या जीवनात उतरावे यासाठी प्रचारकांचे निर्मिती कार्य होईल. हे सर्वांसाठी मुक्तद्वार असेल. फेब्रुवारी २०२० पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन एप्रिलपासून कार्य सुरु होईल.

टॅग्स :Solapurसोलापूरinterviewमुलाखत