शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

विघ्नहर्त्याच्या उत्सवातही अपुऱ्या पावसाचं विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

गेल्या काही वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केल्यानंतर, दोन वर्षांत दमदार पावसाने बळीराजाला पाण्याची कमतरता भासली नाही. याही वर्षी चांगल्या पावसाची ...

गेल्या काही वर्षांपूर्वी दुष्काळाचा सामना केल्यानंतर, दोन वर्षांत दमदार पावसाने बळीराजाला पाण्याची कमतरता भासली नाही. याही वर्षी चांगल्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, सतत रिमझिम व अल्पशा पावसाने काही प्रमाणात खरिपाची पिके हाताला लागली आहेत. मात्र, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सध्या दमदार पावसाची आवश्यकता आहे. पावसाळी हंगामाचा काही अवधी शिल्लक असल्यामुळे या काळात पाऊस पडला, तरच भविष्याची चिंता राहणार नाही. विघ्नहर्त्याचा उत्सवात चकवा दिलेला पाऊस शेवटच्या टप्प्यात समाधानकारक होईल, अशी बळीराजाची अपेक्षा आहे.

कायम पावसाळा

या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असले, तरीही ढगाळ हवामान रिमझिम पाऊस, यामुळे बहुतांश दिवस पावसाळी वातावरण तयार झाले होते. रिमझिम पावसामुळे दुष्काळी पट्ट्यातील गवत उगवले व फुलल्यामुळे डोंगर पठारावर हिरवळ दिसत आहे. याशिवाय मागील पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी चांगली आहे. यामुळे या वर्षी पाऊस नसला, तरी पावसाळी वातावरण कायम आहे.

पावसाळ्याचा आलेख

मे महिन्यात फक्त दोन दिवस पावसाने हजेरी लावली. जून महिन्यात १९ दिवसांत १०३.४ मिमी पाऊस पडला, तर ११ दिवस निरंक म्हणून तर १४ जून रोजी २०.४ मिमी नोंद झाली. जुलैमध्ये १६ दिवसांत १००.१ मिमी, १५ दिवस निरंक, तर ९ जुलै रोजी १४.१ सर्वाधिक पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात १२ दिवसांत २९ मिमी, तर १९ दिवस निरंक म्हणून नोंद झाली. ३० ऑगस्ट रोजी सर्वाधिक ७.२ मिमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरावड्यातही नाममात्र पावसाची नोंद झाली.

----