शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सीना-माढा सिंचन योजनेतील ४२ गावांवर अन्याय होणार आहे : भारत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST

मोडनिंब : सीना-माढा उपसा सिंचन योजनेतील ४२ गावांसाठी पावणेपाच टीएमसी पाणी लागणार आहे. मात्र, आता इंदापूर भागातील गावांसाठी नव्याने ...

मोडनिंब : सीना-माढा उपसा सिंचन योजनेतील ४२ गावांसाठी पावणेपाच टीएमसी पाणी लागणार आहे. मात्र, आता इंदापूर भागातील गावांसाठी नव्याने पाच टीएमसी म्हणजे सीना-माढा उपसा सिंचन योजनेपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. ही बाब पूर्णपणे चुकीची असून, माढा तालुका व जिल्ह्यावर उजनी पाण्याच्या वाटपाबाबत अन्याय होत आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी याविरोधात आंदोलन करावे, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे यांनी दिला.

उजनीच्या पाण्यावर बोलताना त्यांनी खंत व्यक्त कली. धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी अवस्था माढा तालुक्यातील जनतेची झाली आहे. दुष्काळाशी झुंज देणाऱ्या शेतकऱ्यांना सीना-माढा उपसा सिंचन योजना व मोडनिंब वितरिकेच्या माध्यमातून पाणी मिळत आहे. काही भागात अजूनही कॅनाॅलचे काम पूर्ण झालेले नाही. उजनीच्या पाण्याची पळवापळवी जनता सहन करणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

धरण जिल्ह्यामध्ये असताना अनेक योजना निधीअभावी रखडल्या आहेत. या धरणातील गाळ काढून किंवा वाळू विकून पैसा उभा राहील. त्यामधून उजनी धरणाची पाण्याची क्षमताही वाढेल. कृष्णा-भीमा स्थिरीकरणसारखी योजना मंजूर करून त्या योजनेला निधी मंजूर करणे गरजेचे आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून अंबाड, शिराळ, पिंपळकुटे, भोसरे, कुर्डू, बावी, अंजनगाव, तुळशी, परितेवाडी, परिते, घोटी, आहेरगाव व अकोले बुद्रुक ही गावे पाटाने भिजायची अद्याप राहिली असल्याची खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

-----