शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

उत्पन्न दोन लाख तर खर्च साडेसात लाख, सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:41 IST

मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. 

ठळक मुद्देसोलापूर दर्शन ही बस पुन्हा सुरू करण्यात येणार अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची मदत मनपाकडे असलेल्या थकीत रकमांबाबत पाठपुरावा करू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी सहायक आयुक्त हराळे यांच्यावर दिली आहे. सध्या दिवाळी सानुग्रह अनुदान, उचल आणि पाच महिन्यांचा थकीत पगार द्यावा, यासाठी कर्मचाºयांनी सात रस्ता डेपोसमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. २६ आॅक्टोबर रोजी लाक्षणिक संप करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे. अशा परिस्थितीत पदभार घेतलेल्या हराळे यांनी कर्मचाºयांच्या बैठकांवर बैठका घेऊन परिस्थिती सुधारण्यावर भर दिला आहे. मंगळवारी मुख्य तिकीट निरीक्षक भारत कंदकुरे व प्रशासनातील अधिकाºयांची बैठक घेऊन उत्पन्नवाढीसाठी मार्गाचे नियोजन केले. सध्या ४१ बस मार्गावर आहेत. यातून दररोज दोन लाख उत्पन्न मिळत आहे. पण खर्च मात्र साडेसात लाख आहे. साडेपाच लाखांचा तोटा भरून काढण्यासाठी आणखी  दहा गाड्या मार्गावर आणण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रवासी वाढविण्यासाठी शहरातून रिक्षात होणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची मदत घेण्याचे ठरविण्यात आले. सोलापूर दर्शन ही बस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. साखर कारखाना व सैफुलदरम्यान शटल बससेवा सुरू करून उत्पन्नवाढीवर भर देण्यात येणार असल्याचे हराळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कर्मचाºयांना विश्वासात घेऊन जगण्यासाठी आहे त्या परिस्थितीशी लढू ही भूमिका घेऊन काम करणार आहे. -------------------------संपात बस बंद नाहीÈभारी व्यवस्थापक हराळे यांनी मंगळवारी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अशोक जानराव यांची भेट घेऊन लाक्षणिक संप मागे घेण्याबाबत विनंती केली. त्यावर जानराव यांनी आंदोलन सुरू राहील, मात्र बस बंद ठेवून लोकांची गैरसोय केली जाणार नाही, याची हमी दिली. कर्मचाºयांचे थकीत वेतन मिळाले पाहिजे, ही मागणी न्याय्य आहे. यासाठी मनपाकडे असलेल्या थकीत रकमांबाबत पाठपुरावा करू. पण यापुढे वेतनासाठी मनपावर अवलंबून न राहता, दररोजच्या उत्पन्नातून ५० हजार वेतनासाठी काढून ठेवण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.