शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड अनुभव साहित्य परिषदेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:16 IST

अक्कलकोट : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील कन्नड विभाग, अक्कलकोटचे सी.बी. खेडगी महाविद्यालयातील कन्नड विभाग आणि सोलापूर जिल्हा शरण ...

अक्कलकोट : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील कन्नड विभाग, अक्कलकोटचे सी.बी. खेडगी महाविद्यालयातील कन्नड विभाग आणि सोलापूर जिल्हा शरण साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'कन्नड अनुभव साहित्य व व्यक्तिमत्त्व विकास' या विषयावरील ऑनलाइन राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले.

'वचन साहित्य आणि व्यक्तिमत्त्व विकास' या विषयावर कलबुर्गी येथील अप्पा कॉलेज ऑफ आर्ट कॉलेजचे व्याख्याता डॉ. आनंद सिद्दामणी यांनी पहिल्या सत्रात १२ व्या शतकात व्यक्तिमत्त्व विकासासाठी शरणांनी व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया रचल्याचे सांगितले. तसेच प्राचार्य डॉ. व्ही.एस. माळी (हारुगेरी), डॉ. राजशेखर जमदंडी (म्हैसूर), डॉ. श्यामला प्रकाश (मुंबई) यांनीही परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त केले.

प्रास्ताविक भाषण विद्यापीठ भाषा संकुलचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. विद्यापीठ कन्नड विभागाचे डॉ. गौरम्मा इलगंडी व प्रा. शिवानंद तडवळ, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी, सचिव शिवानंद गोगाव, मुंबई विद्यापीठ कन्नड विभागप्रमुख डॉ. जी.एन. उपाध्याय, डॉ. रमेश थेली, डॉ. रोळेकर नारायण, गायत्री पाटील, डॉ. गणपतराव कलशेट्टी, प्रा. विजयालक्ष्मी कुंभार, प्रा. देविका धट्टी, चेतना हेगडे, डॉ. श्यामला विदुषी, डॉ. सिद्धेश्वरी, भौरम्मा स्वामी, पद्मजा देसाई, प्रा. विलास अंधारे, दयानंद कोरे, डॉ.प्रो. शेट्टी, डॉ. पौर्णिमा शेट्टी सहभागी झाले होते.

--

महात्मा बसवेश्वर अभ्यास केंद्राच्या अनुदानासाठी पाठपुरावा : कुलगुरू

डॉ. फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठे ही अशी केंद्रे नाहीत, जी विद्यार्थ्यांना फक्त पदवी प्रमाणपत्र देतात, तर येथून चांगली संस्कृती व मानवतेचे संस्कार होतात. या सावधगिरीने सेवा देण्यास विद्यापीठे बांधील आहेत. प्रत्येकाला समान अधिकार देणे, हेच व्यक्तिमत्त्व विकास होय. यासंदर्भात विद्यापीठांना त्यांच्या जबाबदा-या पार पाडाव्या लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अभ्यास केंद्रास अनुदान मिळण्यासाठी सरकारला निवेदन पाठविल्याचे सांगितले.