शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

'आपला माणूस' या प्रतिमेने भालकेंना तारले

By admin | Updated: October 22, 2014 14:45 IST

पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्‍यांदा विजयापर्यंत घेऊन गेली.

मल्लिकार्जुन देशमुखे ■ मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावातील राजकीय, सामाजिक घडामोडींविषयी असलेली प्रचंड सतर्कता, जनसंवाद, ३५ गावांच्या पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्‍यांदा विजयापर्यंत घेऊन गेली. मोदी लाट व महायुतीचा प्रभाव निकामी ठरत भालकेंचा करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला.
अत्यंत मुरब्बी राजकारणी असलेले आ. भालके यांनी ३५ गावांचा पाणीप्रश्न या निवडणुकीत त्रासदायक ठरू नये, यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून वेळीच डाव साधला. या पाणी प्रश्नाबरोबर मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षातील नेते, मंत्री यांच्याकडे पाठपुरावा कायम ठेवला. त्याच गावातील नागरिकांच्या मतांनी भालकेंना निर्णायक आघाडी मिळवून दिली.
आ. भालकेंविरुद्ध टक्कर देत त्यांच्यावर मात करण्यासाठी किंवा कामाची पद्धतही गेल्या पाच वर्षांत विरोधक उभे करू शकले नाहीत. प्रशांत परिचारक हे शहराबरोबर ग्रामीण भागातही आ. भालकेंच्या विरोधात प्रभावी गट उभे करू न शकल्याने भालकेंसाठी ही जमेची बाजू ठरली. कमी वेळेत प्रभावी यंत्रणा उभारून शिवसेनेचे समाधान आवताडे यांनी आ. भालके व परिचारक यांना घाम फोडला. पहिल्याच प्रयत्नात ४१ हजार मते मिळवून त्यांनी मंगळवेढा तालुक्यात आपली शक्ती दाखवून दिली.
मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांबरोबर मरवडे, लक्ष्मीदहिवडी, ब्रह्मपुरी गण व भोसे गटातील मतदारांनी चांगली साथ दिल्याने विजयाचा पैलतीर गाठता आला. आ. भालकेंविरोधात प्रचार करताना मतदारांच्या हृदयाचा ठाव घेणारे प्रभावी मुद्देच न आढळल्याने मतदार धोका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे आढळून आले.
------------
मागील २५ वर्षांत मंगळवेढा तालुक्याचा विकास खुंटला होता. दुष्काळी तालुका अशी ओळख असून, शेतकर्‍यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठीच प्रयत्न करावे लागतील. - भारत भालके, आमदार 
--------------
डिपॉझिट जप्त
 ■ राज्यात सत्ताधारी असणार्‍या राष्ट्रवादी पक्षाचा मंगळवेढा बालेकिल्ला असताना या पक्षाचे उमेदवार चंद्रकांत बागल यांना डिपॉझिट जप्तीची नामुष्की आली. गादेगाव येथील त्यांच्या घरातसुध्दा सी.पी. बागल यांना तिसर्‍या क्रमांकावर मतदारांनी फेकले आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.