शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 11, 2014 00:07 IST

करमाळा : पोटेगाव येथे सीना नदीच्या पात्रातून पाच जेसीबी व तीन पोकलेनच्या सहाय्याने रोज शंभर ट्रक वाळूचा उपसा सुरू असून प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या ठेक्यावर कारवाई करावी व ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी मनेसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.

 

करमाळा : पोटेगाव येथे सीना नदीच्या पात्रातून पाच जेसीबी व तीन पोकलेनच्या सहाय्याने रोज शंभर ट्रक वाळूचा उपसा सुरू असून प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असून जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या ठेक्यावर कारवाई करावी व ठेकेदाराला पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी मनेसेचे शहराध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.पोटेगाव ता.करमाळा येथील वाळूचा लिलाव झाला आहे. ठेकेदाराने मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू केला आहे.ज्या जमिनीच्या गट नंबर मधून वाळू उपसण्यास परवानगी दिली आहे तो गट सोडून संपूर्ण नदीच्या पात्रातूनच उपसा सुरू आहे. तीन फुटापेक्षा जास्त खोल वाळूचा उपसा करू नये असा नियम असताना तीस फूट खोल खड्डे जेसीबीने खणून वाळू उपसली जात आहे. कोणत्याही वाळू वाहतूक करणार्‍या गाडीला पावती दिली जात नाही. २१०० ब्रास वाळू उचलण्याचा ठेका असताना दहा दिवसात जवळपास १० हजार ब्रास वाळू उपसण्यात आली आहे. याबाबत तहसील कार्यालयात तक्रार दिली असता उलटसुलट उत्तरे देऊन दुर्र्लक्ष केले जात आहे. या वाळूच्या ठेक्यात राजकीय पदाधिकारी असून, या प्र्रकरणात अधिकारी कारवाई करीत नाहीत. पोटेगावमधून विरोध करणार्‍या शेतकर्‍यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा वाळू ठेका रद्द करून बेकायदा वाळू उपसा करणार्‍यावर कारवाई करून त्यांना दंड करावा अन्यथा मनसेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. (वार्ताहर)--------------------------------------------------------------------------------------रामवाडी वाळू ठेक्याच्या स्थगितीविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणाररामवाडी ता.करमाळा येथील भीमा नदीपात्रातील वाळू परवानगी नसताना उचलणार्‍या ठेकेदाराची ६ कोटी ५० लाखांची अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी घेतला. हा निर्णय ऐतिहासिक असून वाळू ठेकेदारांना जरब बसावी म्हणून घेतलेला निर्णय होता पण या निर्णयास महसूल मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने या स्थगिती विरोधात आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे मनसेचे नानासाहेब मोरे यांनी सांगितले.