शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

बँकांकडून कर्ज उपलब्ध झाल्यास एकरकमी एफआरपी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:23 IST

साखर उद्योगाबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांशी चर्चेनंतर मार्ग निघेल. गळीत हंगामाच्या ...

साखर उद्योगाबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांशी चर्चेनंतर मार्ग निघेल. गळीत हंगामाच्या सुरुवातीच्या काळात साडेनऊ ते दहा रिकव्हरी रेट लागत असून डिसेंबर ते जानेवारी दरम्यान रिकव्हरी वाढत असते. साधारणपणे एक टन ऊस गाळपातून साडेआठशे किलो साखर निघत असते. मात्र, एक टन गाळप केल्यानंतर २६०० रुपयांप्रमाणे पैसे बँक देत आहे. खर्च ३२०० रुपयांपर्यंत होत आहे. सरकारचा कोटा येईल, तशी साखर विकावी लागत आहे. यामुळे या वर्षी प्रति गोणी २१२ रुपयेप्रमाणे व्याज गेले आहे. पूर्वीच्या काळात पहिल्या पंधरा दिवसांचे पैसे गोळा करून बिल अदा करण्याचे काम करत होतो. केंद्र सरकारकडे दोन वर्षांपूर्वीचे ३८ कोटी रुपये निर्यात अनुदान थकले असून या वर्षीचे २० कोटी असे ५८ कोटी अनुदान अडकले आहे. साखरेचे बाजारभाव स्थिर ठेवून यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. एफआरपीबाबत शेतकऱ्यांचा विरोध असणे साहजिक आहे, असेही ते म्हणाले.

..................

वाहतूक दर वाढवून देणार

पुणे जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्याच्या ऊस वाहतुकीचे दर आठ टक्क्यांनी जास्त आहेत. डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने या वर्षीदेखील वाहतूक दर वाढविण्यात येणार आहे. मात्र हे माहिती असूनही आंदोलन करून कोणी काय फायदा करून घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वाहतूक दर वाढल्याने कारखानदारांना फरक पडणार नसून शेतकऱ्याच्या बिलामधूनच हे पैसे जात असतात, असेही आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

.......

फोटो : आमदार बबनराव शिंदे