शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार; मात्र भाजपशी युती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

या पत्रकार परिषदेला बाबासाहेब करांडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, गिरीश गंगथडे, सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, बाळासाहेब काटकर, वैभव केदार, डॉ. ...

या पत्रकार परिषदेला बाबासाहेब करांडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, गिरीश गंगथडे, सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, बाळासाहेब काटकर, वैभव केदार, डॉ. दादा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पक्षाचा गाभा मार्क्सवादी असल्यामुळे टीका-आत्मटीकेचा आधार घेऊन काम चाललेले असते. राज्यात १४ पक्षांची प्रागतिक आघाडी आहे. आघाडीची भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. सांगोल्यात शेकापक्षात कोणीही कोणावर नाराज नाही. कोणाच्या घरात भांडण नसते, तो पक्षाच्या घरातील विषय आहे. त्यामुळे त्याची चर्चा करण्याची गरज नाही. तशी गरज वाटल्यास राज्य चिटणीस म्हणून मी खंबीर आहे.

मध्यवर्ती बैठकीत तालुक्यातील दोन हजार कार्यकर्ते तालुका व जिल्हा पातळीवरील सभासद यांच्यात कौटुंबिक वातावरणात विचारमंथन झाले आणि पुन्हा नव्या जोमाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेकापचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेता आहे. तरीही पक्षात काही अडचण आली तर स्थानिक २५ ते ३० जणाची सक्षम टीम आहे, ते निर्णय घेतात. शेकाप सांगोल्यातच नव्हे तर बापू जिल्ह्यात समविचारी पक्षांशी युती करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवणार आहेत.

पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

मंथन बैठकीत आक्कासाहेब ठरवतील तोच उमेदवार असेल, याच्यावर लगेचच पलटवार करीत मेळाव्यातील बोलण्याचा विनोदाचा भाग असल्याचे सांगून त्यांनी उपस्थित डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे बोट दाखविण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेतृत्वाबाबत काय समजून घ्यायचे ते घेतले आहे.

दरम्यान, दोन दिवसीय चाललेल्या पक्षाच्या झालेल्या बैठकीत राज्यापासून ते गावपातळीवरील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. येत्या महिनाभरात ८० टक्के तरुणांना प्राधान्य देऊन नवीन कार्यकारिणीची घोषणा केली जाईल.

शेतकऱ्यांची फसवणूक थांबली पाहिजे

वीज बिलात सवलत मिळावी, कोरोना काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरता आली नाही. त्यामुळे विनाअनुदानित तत्त्वावरील शैक्षणिक फी राज्य शासनाने भरली पाहिजे. आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार दोघांची फसवणूक करीत आहे. महिला अत्याचाराबाबत केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना मदतीची घोषणा केली परंतु मिळाली नाही. त्यांना मदत मिळाली पाहिजे, शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा निर्णय घातक अन्यायकारक असल्याने त्याचा फेरविचार व्हावा. शेतकऱ्याची फसवणूक थांबली पाहिजे असा ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आला.