शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार; मात्र भाजपशी युती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:24 IST

या पत्रकार परिषदेला बाबासाहेब करांडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, गिरीश गंगथडे, सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, बाळासाहेब काटकर, वैभव केदार, डॉ. ...

या पत्रकार परिषदेला बाबासाहेब करांडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, गिरीश गंगथडे, सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, बाळासाहेब काटकर, वैभव केदार, डॉ. दादा जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पक्षाचा गाभा मार्क्सवादी असल्यामुळे टीका-आत्मटीकेचा आधार घेऊन काम चाललेले असते. राज्यात १४ पक्षांची प्रागतिक आघाडी आहे. आघाडीची भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. सांगोल्यात शेकापक्षात कोणीही कोणावर नाराज नाही. कोणाच्या घरात भांडण नसते, तो पक्षाच्या घरातील विषय आहे. त्यामुळे त्याची चर्चा करण्याची गरज नाही. तशी गरज वाटल्यास राज्य चिटणीस म्हणून मी खंबीर आहे.

मध्यवर्ती बैठकीत तालुक्यातील दोन हजार कार्यकर्ते तालुका व जिल्हा पातळीवरील सभासद यांच्यात कौटुंबिक वातावरणात विचारमंथन झाले आणि पुन्हा नव्या जोमाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेकापचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेता आहे. तरीही पक्षात काही अडचण आली तर स्थानिक २५ ते ३० जणाची सक्षम टीम आहे, ते निर्णय घेतात. शेकाप सांगोल्यातच नव्हे तर बापू जिल्ह्यात समविचारी पक्षांशी युती करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवणार आहेत.

पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

मंथन बैठकीत आक्कासाहेब ठरवतील तोच उमेदवार असेल, याच्यावर लगेचच पलटवार करीत मेळाव्यातील बोलण्याचा विनोदाचा भाग असल्याचे सांगून त्यांनी उपस्थित डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे बोट दाखविण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेतृत्वाबाबत काय समजून घ्यायचे ते घेतले आहे.

दरम्यान, दोन दिवसीय चाललेल्या पक्षाच्या झालेल्या बैठकीत राज्यापासून ते गावपातळीवरील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. येत्या महिनाभरात ८० टक्के तरुणांना प्राधान्य देऊन नवीन कार्यकारिणीची घोषणा केली जाईल.

शेतकऱ्यांची फसवणूक थांबली पाहिजे

वीज बिलात सवलत मिळावी, कोरोना काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरता आली नाही. त्यामुळे विनाअनुदानित तत्त्वावरील शैक्षणिक फी राज्य शासनाने भरली पाहिजे. आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार दोघांची फसवणूक करीत आहे. महिला अत्याचाराबाबत केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना मदतीची घोषणा केली परंतु मिळाली नाही. त्यांना मदत मिळाली पाहिजे, शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा निर्णय घातक अन्यायकारक असल्याने त्याचा फेरविचार व्हावा. शेतकऱ्याची फसवणूक थांबली पाहिजे असा ठराव या बैठकीमध्ये घेण्यात आला.