शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भगीरथ भालके यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याबाबत शिफारस करीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:21 IST

मंगळवेढा : भगीरथ भालके यांना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याबाबत पक्षीय स्तरावर शिफारस करीन. जिल्हाध्यक्षांनी ठरवलेच आहे तर त्यात ...

मंगळवेढा : भगीरथ भालके यांना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याबाबत पक्षीय स्तरावर शिफारस करीन. जिल्हाध्यक्षांनी ठरवलेच आहे तर त्यात बदल होणार नाही, असे प्रतिपादन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

ते मंगळवेढा येथील स्व. आ. भारत भालके यांच्या जयंतीनिमित्त मतदारसंघातून सुरू करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. राजन पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. संजयमामा शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, उत्तम जानकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, राहुल शहा, लतिफ तांबोळी, भारत बेदरे, मुजम्मिल काझी, अरुणाताई माळी, अनिता नागणे, संगीता कट्टे, विजय खवतोडे, मारुती वाकडे, अजित जगताप, चंद्रकांत घुले, दिलीप जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहोळचे माजी आ. राजन पाटील यांनी भारत भालके हे अतिशय संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या संघर्षाचा वारसा भगीरथ भालके निश्‍चितपणे पुढे घेऊन जातील.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी पंढरपूर व मंगळवेढ्याचे जनतेच्या मनातील उमेदवार आम्हाला समजला असून या जनसंवाद यात्रेला आलेला जनसमुदाय पाहता भगीरथ भालके यांच्याशिवाय दुसऱ्याला उमेदवारी दिली जाणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे आम्ही भगीरथ यांच्या नावाची मागणी करणार असून इतर उमेदवार याठिकाणी दिला जाणार नाही, असे सांगितले. आ. प्रणिती शिंदे,

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांची भाषणे झाली. शनिवारी सायंकाळी येथील आठवडा बाजार मैदानात जनसंवाद यात्रेचा शुभारंभ सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग चौगुले यांनी केले.

सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माजी सभापती संभाजी गावकरे यांनी मानले. यावेळी उमेश पाटील, उत्तमराव जानकर, दत्ता म्हस्के, नारायण घुले, शिवानंद पाटील, यशवंत खताळ यांनी मनोगत व्यक्त केले.

----

मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या 19 हजारांपेक्षा अधिक सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचे कारस्थान विद्यमान संचालक मंडळाने केले असून याबाबत सहकारमंत्री यांनी सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यासंबंधी कार्यवाही करावी, अशी विनंती यावेळी व्यासपीठावर भगीरथ भालके यांनी केली.