शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

देव देव्हाऱ्यात अन्‌ भक्त घराघरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

तब्बल आठ महिन्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर दीपावली पाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत ...

तब्बल आठ महिन्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल मंदिर दीपावली पाडव्यापासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत किमान अंतर राखत दर्शन सुविधा उपलब्ध झाली.

सध्या विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाऐवजी मुखदर्शन घडविले जात आहे. त्यासाठी ऑनलाइन दर्शन पास बुकिंग करणे बंधनकारक केले. चैत्री, आषाढी, कार्तिकी यात्रा भाविकांविना पार पडली. पुन्हा विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू झाले आहे. यामुळे पंढरीत थोड्या प्रमाणात गर्दी होत आहे. ज्यांना शक्य नाही त्या मंडळींनी देव मनामनात जागवत भक्तिभाव जागवावा लागत आहे.

पंढरीच्या पांडुरंगानंतर महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती असलेल्या स्वामी समर्थांच्या दर्शनासंबंधी भक्तांना विरह सहन करावा लागला. आठ महिन्यांनी मंदिर पूर्ववत सुरू झाले. शासनाचे निर्देश पाळून देवाचं साजिरं रूप अंतर ठेवून का होईना मिळू लागलं आहे. मात्र कोरोनाच्या दडपणाखाली दर्शन घ्यावं लागत असल्याची सलही भाविकांमधून बोलून दाखवली जात आहे. गर्दी टाळावी यासाठी ठराविकच भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येत होते. आताही ‘श्री’ चे दोन वेळची विधीवत पूजा वगळता धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. आता तर पुन्हा मंदिर शासनाच्या आदेशानुसार बंद करावे लागले आहे.

जिल्ह्यात एकमेव असलेले भगवंत मंदिरही खुले केल्यानंतर दर्शनासाठी दररोज साधारण हजार ते दीड हजार स्थानिक भाविक येतात. बाहेरगावच्या भक्तांचे प्रमाण कमी आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन सुरू आहे. मंदिरात मास्कशिवाय प्रवेश नाही. दारात सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे.

----

भगवंत मंदिरात वेळ बदलली

एरव्ही शहरातील अनेक व्यापारी संध्याकाळी दुकान बंद केल्यानंतर रात्री आठ किंवा नऊनंतर दर्शनाला येत असत, मात्र या बदललेल्या वेळेमुळे हे लोकदेखील दिवसात जसा वेळ मिळेल तसे दर्शन घेऊन जातात. मंदिराच्या दोनपैकी एकाच दरवाजातून प्रवेश दिला जातो.

थेट मूर्तीपर्यंत भविकाना प्रवेश दिला जात नाही. पुजारी आणि भाविक यांच्यामध्ये अंतर राहावे यासाठी एक टेबल ठेवलेला आहे.

–-- - ––--------

देव, पुजारी अन्‌ भाविकांमध्ये अंतर

- पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, बार्शीचे भगवंत मंदिर यासह गावोगावच्या मंदिरामध्येही सध्या देव, पुजारी अन्‌ भाविकांच्या मध्ये अंतर ठेवून दर्शनाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

----