शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं अन्‌ पेरूतून पाच लाखाचं उत्पन्न घेतलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:23 IST

कुसळंब : लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं. मात्र हार न मानता कुसळंबच्या (ता. बार्शी) इथल्या प्रभाकर शिंदे आणि नारायण ...

कुसळंब : लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद पडलं. मात्र हार न मानता कुसळंबच्या (ता. बार्शी) इथल्या प्रभाकर शिंदे आणि नारायण शिंदे या पितापुत्रांनी अवघ्या ३५ गुंठ्यात पेरुची लागवड करून तब्बल पाच लाख रुपयांचा उत्पन्न घेतले आहे.

खरीप हंगामाने दिलेला दगा, त्यातच बोरीला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बोरीच्या बागा उखडून टाकल्या. प्रभाकर शिंदे हेही याला अपवाद नव्हते. त्यांनीही बोरीची बाग काढून हॉटेल व्यवसाय सुरू केला. कोरोना महामारीत हॉटेल व्यवसाय बंद पडला. लॉकडाऊन काळात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३५ गुंठ्यांमध्ये थाई पेरूची लागवड केली. प्रभाकर शिंदे व त्यांचा मुलगा नारायण शिंदे या पितापुत्रांनी आठ महिन्यांत पाच लाख ४४ हजार रुपयाचे उत्पन्न घेतले.

अशी केली लागवड

शिंदे यांना सात एकर शेती असून, त्यापैकी पाच एकर बोर आहे व बाकी दोन एकर मुरमाड जमीन आहे. शेतीला जोड म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू केला, मात्र कोरोनामुळे तोही बंद पडला. ३५ गुंठे बोर बाग काढून त्यात थाई पेरूची बाग लावण्याचे ठरविले. ४ एप्रिल २०२० रोजी इस्राइल पद्धतीने आठ बाय सहाप्रमाणे लागवड केली. त्याला ड्रीप पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली. ५०० झाडे लावण्यात आली. मजुरांचा खर्च एकूण ६० हजार रुपये खर्च आला.

पेरूच्या बागेत मनुष्यबळ कमी लागते. या फळावर भुरी आणि मिलीबग रोगाची लागण होते. त्यासाठी झाडांना कॅल्शियम, पोटॅश मायकोन्युबची फवारणी करण्यात आली. त्यामुळे मजूर व फवारणीचा खर्च अत्यंत कमी होतो, असे शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

स्वत:चा स्टॉल टाकून विक्री

सहा महिन्यांमध्ये झाडांना फळे येऊ लागली, तर आठव्या महिन्यांत विक्रीसाठी उपलब्ध झाली. एका झाडास २० ते २५ किलो पेरू धरले. एक पेरू कमीतकमी ५०० ते ७०० ग्रॅम वजनाचा तयार झाला. प्रभाकर शिंदे यांनी तो पाऱ्यास न देता आपणच विक्री करण्याचे ठरवले. बार्शी-लातूररोडवर त्यांच्या हॉटेलसमोर पेरू स्टॉल लावला.

पूर्ण माल विकूनच घरी जायचे

दररोज ५० किलो विक्री टोलवरून होऊ लागली. काही ६० रुपये, तर काही ५० रुपये दराने विक्री होऊ लागली. वडिलांनी शेतातून हॉटेलपर्यंत पेरू पोचवायचे आणि ते मुलांनं पूर्ण माल विकूनच मग घरी जायचे.

----

पेरूच्या लागवडीसाठी कृषी अधिकारी प्रसेनजित जानराव व प्रगतिशील शेतकरी खंडेराव लवांड यांनी मार्गदर्शन केले. तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता सुधारित पद्धतीने शेतीकडे वळावे.

- शेतकरी नारायण शिंदे

----