शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादन अभियान : सोलापूरची आघाडी

By admin | Updated: September 3, 2014 00:39 IST

राज्यभरातून अवघ्या १६ हजार शेतकऱ्यांची मागणी

 सोलापूर: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेतीपूरक योजनांसाठी राज्यभरातून १६ हजार २०९ शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केले असून एकट्या सोलापूर जिल्ह्यातून ५ हजार ६०९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नाशिक, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, धुळे व बुलढाणा जिल्ह्यातूनही फलोत्पादनासाठी शेतकरी पुढे आले आहेत.राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेती व्यवसायासाठी विविध योजना राबविल्या जातात. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातून आलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा फलोत्पादन अभियान समितीमार्फत आलेल्या अर्जातून सोडत काढली जाते. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज असले तरच सोडत काढण्यात येते. सेटनेट, पॅकहाऊस, प्रक्रिया केंद्र अशा २८ बाबींसाठी शासनाचे अनुदान मिळते. सोलापूर, जालना, नाशिक, औरंगाबाद, धुळे, बुलढाणा, कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यातून फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. -------------------------सोलापूरपाठोपाठ नाशिक जिल्हा४ सोलापूर- ५,६०९, नाशिक-२१७८, जालना- १६९५, अहमदनगर- १२२६, औरंगाबाद-९८३, धुळे- ६४९, बुलढाणा- ५०८, कोल्हापूर-४२६, जळगाव-४४४, सातारा-२७४, परभणी-२२३, वाशिम-२०८, सिंधुदूर्ग-१९७, लातूर-१८३, रत्नागिरी-१७५, नंदूरबार-१७५, ठाणे-१२०, बीड-११०, नांदेड-१०२, सांगली-९९, वर्धा-९२, नागपूर-९१, रायगड-८७, यवतमाळ-७०, उस्मानाबाद-६०, अमरावती-५१, पुणे-४९, गोंदिया-४०, हिंगोली-३६, अकोला-३०, गडचिरोली-७, चंद्रपूर-६, भंडारा-४ याप्रमाणे फलोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.-------------------------------------पंढरपूरच्या ११२५ शेतकऱ्यांची मागणी४जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केल्याने सोडतीतून नशीब आजमावे लागत आहे. पंढरपूर तालुक्यातून ११२५, करमाळा-८५९, माळशिरस-८१०, माढा-५३३, मोहोळ-४६२, दक्षिण सोलापूर-३७७, सांगोला-३७५, बार्शी-३५१, मंगळवेढा-३३८, उत्तर सोलापूर-१९७, अक्कलकोट-१८२़-------------------------------शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यातून अर्जांची संख्या अधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सोडत काढण्यात आली आहे. जिल्ह्याला ९ कोटी ३५ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- रफिक नाईकवाडी, अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी