शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

ग्रामसुरक्षेच्या मदतीने नऊ वर्षात गुन्ह्याच्या ४९ हजार घटना हाताळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST

कुसळंब : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव (आ.) येथे महालक्ष्मी ...

कुसळंब : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव (आ.) येथे महालक्ष्मी मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा संदर्भात आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नऊ वर्षांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेने मार्फत ४९ हजार घटना हाताळल्याचे सांगितले. प्रत्येक घटनेत ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोर दरोडेखोर जेरबंद करता आले आहेत. एकही प्रकरणात चोर सुटला नाही. आपण फक्त मुके व बहिरे होता कामा नये. ही यंत्रणा ४८ तासात बार्शी तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी सांगितले.

याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे, नायब तहसीलदार संजय मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव उपस्थित होते.

यावेळी बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकायला मिळणार आहे आणि गुन्ह्याला आळा घालणे शक्य होणार असल्याचे गोर्डे यांनी सांगितले. नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ५९ गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील व नागरिकांना पुढील काळात ४८ तासात तुमची गावी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित होईल, असे आश्वासन दिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल यांनी प्रयत्न केले.

-----------

फोटो: १७ कुसळंब

ग्रामसुरक्षा दलाच्या आढावा बैठकीत संबोधताना डी.के. गोर्डे