शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

‘भाटघर, नीरा-देवधर, वीर’च्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST

गेल्या काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. ...

गेल्या काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. वीर धरणात २१ जुलै रोजी ४३.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नीरा उजवा कालवा, नदीपात्राच्या कडेला पाणीसाठ्यात पाणी जमा होत असून पाणीपातळीत वाढ होणार आहे.

चालू हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, फळपिकांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार आहे. या नदीवर बांधलेले बंधारे पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. नीरा खोऱ्यातील धरणे भरत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला, सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

भाटघर पाणीसाठा

पाणी पातळी ६२३.२८ मी.

एकूण साठा ६२०.८५ द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ६०९.९४ द.ल.घ.मी.

टक्केवारी ३०.५६ टक्के

गतवर्षी टक्केवारी ३६.८७ टक्के

उपयुक्त साठा २३.५० टीएमसी.

वीर धरण पाणीसाठा

पाणी पातळी ५७९.८५ मी.

एकूण साठा ५७१.६२ द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ५७३.८८ द.ल.घ.मी.

टक्केवारी ४३.७० टक्के

गतवर्षी टक्केवारी ३८.८८ टक्के

उपयुक्त साठा ९.४१ टीएमसी

निरा देवधर पाणीसाठा

पाणी पातळी ६६७.१० मी.

एकूण साठा ६६२.१० द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ६५०.३० द.ल.घ.मी.

टक्केवारी ३९.७१ टक्के

गतवर्षी टक्केवारी २२.५७ टक्के

उपयुक्त साठा ११.७३ टीएमसी