शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

‘भाटघर, नीरा-देवधर, वीर’च्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST

गेल्या काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. ...

गेल्या काही दिवसांपासून नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. वीर धरणात २१ जुलै रोजी ४३.७० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नीरा उजवा कालवा, नदीपात्राच्या कडेला पाणीसाठ्यात पाणी जमा होत असून पाणीपातळीत वाढ होणार आहे.

चालू हंगामातील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, फळपिकांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे हजारो एकर शेतीला फायदा होणार आहे. या नदीवर बांधलेले बंधारे पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. नीरा खोऱ्यातील धरणे भरत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर व सांगोला, सातारा जिल्ह्यातील फलटण व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

भाटघर पाणीसाठा

पाणी पातळी ६२३.२८ मी.

एकूण साठा ६२०.८५ द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ६०९.९४ द.ल.घ.मी.

टक्केवारी ३०.५६ टक्के

गतवर्षी टक्केवारी ३६.८७ टक्के

उपयुक्त साठा २३.५० टीएमसी.

वीर धरण पाणीसाठा

पाणी पातळी ५७९.८५ मी.

एकूण साठा ५७१.६२ द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ५७३.८८ द.ल.घ.मी.

टक्केवारी ४३.७० टक्के

गतवर्षी टक्केवारी ३८.८८ टक्के

उपयुक्त साठा ९.४१ टीएमसी

निरा देवधर पाणीसाठा

पाणी पातळी ६६७.१० मी.

एकूण साठा ६६२.१० द.ल.घ.मी.

उपयुक्त साठा ६५०.३० द.ल.घ.मी.

टक्केवारी ३९.७१ टक्के

गतवर्षी टक्केवारी २२.५७ टक्के

उपयुक्त साठा ११.७३ टीएमसी