शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

दवंडी देऊन शेतकऱ्यांना बोलावले, तलाठ्यानेच मारली बैठकीला दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST

मंद्रुप येथील निंबर्गी, कंदलगाव, येळेगाव व माळकवठे शिवारात औद्योगिक वसाहत होणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांची बैठक ...

मंद्रुप येथील निंबर्गी, कंदलगाव, येळेगाव व माळकवठे शिवारात औद्योगिक वसाहत होणार असल्याचे सांगण्यात येते. यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत सुरुवातीपासून अनेक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतरही त्यांच्या उताऱ्यावर इतर हक्कात औद्योगिक वसाहत नोंद केल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आम्ही वारंवार विरोध केल्यानंतरही शासन आमच्या उताऱ्यावरील बोजा कमी करत नसल्यामुळे शेतीची खरेदी-विक्री करताना तसेच बँकेचे कर्ज काढताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची संमती अथवा विरोध आहे, अशा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे काम सुरू आहे. सध्या सुगीचे दिवस सुरू असताना ही शेतकऱ्यांना बोलावून घेतले जाते. तसेच पुन्हा शेतक-यांना बोलावून घेतले. मात्र त्या बैठकीला तहसीलदार, तलाठी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे शेतकरी संतापले असून औद्योगिक वसाहत नोंद कमी न झाल्यास तलाठी कार्यालयास कुलूप लावून गाव बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी प्रभाकर कोरे, अप्पाराव कोरे, बाबुराव मेंडगुदले, अनिल मेंडगुदले, बसवराज कुंभार, प्रवीण कुंभार, सदाशिव जोडमोटे, मलकारसिध्द जोडमोटे, अमोगसिध्द हजारे, नामदेव हजारे, मलकारसिध्द गुंजाटे, महादेव कुंभार, मल्लीनाथ जोडमोटे, बाबुराव कोळी यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.