शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

कष्टानं पिकवलेलं पिवळं सोनं बाजारात आलं अन् भाव पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

बार्शी बाजारात गणेशोत्सवाच्या काळात यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली. पहिल्याच दिवशी ११ हजार ५११ रुपये क्विंटलने सोयाबीन विकले ...

बार्शी बाजारात गणेशोत्सवाच्या काळात यंदाच्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरु झाली. पहिल्याच दिवशी ११ हजार ५११ रुपये क्विंटलने सोयाबीन विकले गेले. त्याच दिवशी जवळपास आठ ते साडेआठ हजार रुपये दर होता. मात्र केवळ आठ दिवसात हे दर साडेतीन ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. म्हणजेच जवळपास पाच हजार रुपयांनी दर तुटले आहेत. आता खऱ्या अर्थाने सोयाबीनची काढणी सुरु झाली आहे. नेमका शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याच्या वेळीच हे दर खाली आले आहेत. त्यामुळे बळीराजा हिरमुसला आहे.

उडीदाची परिस्थिती याहून वाईट

बार्शीच्या बाजार समितीत दहा हजार कट्टे सोयाबीनची आवक आहे. उडीदाची तर यापेक्षा वाईट स्थिती आहे. बाजारात पाच ते सात हजार कट्टे आवक आहे. मात्र दर ३ ते ७ हजार रुपये मिळत आहे. यातील केवळ २०० ते ५०० कट्टे माल हा सात हजार रुपयांनी विकला जात आहे. उर्वरित माल हा पावसामध्ये भिजून डागील झाला असल्याने या उडीदाला ३५०० ते ४००० रुपये दर मिळत आहे. ज्चारीची पाच ते सहा हजार कट्टे आवक असून दर १२०० -२१००-३००० रुपये मिळत आहे.

केवळ केंद्राच्या धोरणामुळे भाव आले खाली

ज्यावेळी शेतकरी आणि व्यापारी या दोघांकडेही सोयाबीनचा माल नव्हता. त्यावेळी मात्र सोयाबीनला ९ ते ११ हजार रुपये दर होता. प्रत्यक्षात माल आला तेव्हा हे दर खाली का आले याविषयी बोलताना खरेदीदार सचिन मडके म्हणाले की, केंद्र सरकारने सोयाबीनची आवक करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाम तेलावरील आयात शुल्क कमी केले. त्यामुळे हे सोयाबीनचे दर घसरले आहेत. याला पूर्णता केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे.

----

आयात थांबल्यास दर वाढतील

शेतकऱ्यांनी माल झाला की लगेच बाजारात विक्रीसाठी आणण्याची घाई करु नये. जोपर्यंत दर वाढत नाहीत तोपर्यंत वाट पाहावी. केंद्राने आयात थांबवल्यास दर निश्चित वाढतील, असे जाणकार व्यापारी म्हणत आहेत. यावर्षी जास्तीच्या पावसामुळे उडीदासोबतच सोयाबीनचे देखील खूप नुकसान झाले आहे. आता तरी पाऊस थांबणे गरजेचे आहे़.

----