शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
4
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
5
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
6
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
7
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
8
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
9
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
10
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
11
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
12
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
13
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
14
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
15
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
16
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
17
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
18
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
19
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
20
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्याला फसवून पालकमंत्र्यांनी पाणी पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

पालकमंत्र्यांच्या हेतूमुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठा आघात ठरणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी या बैठकीत सर्व पदाधिकऱ्यांनी यावेळी केली ...

पालकमंत्र्यांच्या हेतूमुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठा आघात ठरणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी या बैठकीत सर्व पदाधिकऱ्यांनी यावेळी केली आहे.

मंगळवारी दुपारी १ वाजता कुर्डू येथील गाडेवस्तीवर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी एकत्र जमले. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, शेतकरी नेते अतुल खूपसे-पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळवणकर, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता व्यवहारे, रयत शेतकरी संघटनेचे नेते दिगंबर गायकवाड, स्वाभिमानी संघटनेचे नेते अजित बोरकर, धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र वाघमारे, कोळी महासंघ शेतकरी संघटनेचे पप्पू कोळी व किसान मोर्चाचे पदाधिकारी आदी वर्गांची एकत्रित बैठक झाली.

यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.

या बैठकीत प्रत्येकाने उजनी धरणासंबंधी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना जनहितचे प्रभाकर देशमुख म्हणाले की, पालकमंत्र्यांनी पळविलेले पाणी हे जिल्ह्याच्या हक्काचे आहे. त्यांनी येथील सर्वांची दिशाभूल करीत इंदापूरच्या फायद्यासाठी पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय मंजूर करून घेतला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही हात असल्याने त्यांच्या पक्षाचे नेते याविरुद्ध काही करू शकणार नाहीत, म्हणून आम्ही सर्व जण एकत्र येत उजनी धरणाबाबत लढा उभा करीत असल्याचे स्पष्ट केले.

धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी याबाबत लवकरच जनहित याचिका दाखल करत असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

-----

महाराष्ट्रदिनी लढा उभारणार

शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील बोलताना म्हणाले की, उजनी धरण म्हणजे सर्वांच्या आत्मीयतेचा विषय आहे. त्यात या निर्णयाच्या मागे स्वतः अजित पवार हे अग्रस्थानी असल्याने करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी याबाबत जी भूमिका घेतली आहे, ती चुकीची आहे. ते म्हणतात की, मी पवार साहेबांच्या मर्जीतला असून, त्यांचा कोणताही शब्द मोडत नाही. यावरून त्यांनी जर यावर त्यांना गप बसण्याचे आदेश दिले, तर ते काहीही करू शकणार नाहीत. म्हणून सर्वसामान्य नागरिकांनाच या लढ्यात उतरावे लागणार आहे. म्हणून १ मे या महाराष्ट्रदिनी आम्ही उजनीसंबंधी मोठा लढा उभा करत आहोत. त्यास सर्वांनी सहकार्य करावे.

----

२७ कुर्डूवाडी-उजनी बैठक १,२,३

पालकमंत्र्यांनी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला घेतल्याच्या निषेधार्थ कुर्डू येथे आयोजित बैठकीला उपस्थित शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी.