शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सोलापूर जिल्ह्याला फसवून पालकमंत्र्यांनी पाणी पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:23 IST

पालकमंत्र्यांच्या हेतूमुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठा आघात ठरणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी या बैठकीत सर्व पदाधिकऱ्यांनी यावेळी केली ...

पालकमंत्र्यांच्या हेतूमुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठा आघात ठरणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी या बैठकीत सर्व पदाधिकऱ्यांनी यावेळी केली आहे.

मंगळवारी दुपारी १ वाजता कुर्डू येथील गाडेवस्तीवर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी एकत्र जमले. जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, शेतकरी नेते अतुल खूपसे-पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळवणकर, प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता व्यवहारे, रयत शेतकरी संघटनेचे नेते दिगंबर गायकवाड, स्वाभिमानी संघटनेचे नेते अजित बोरकर, धाराशिव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र वाघमारे, कोळी महासंघ शेतकरी संघटनेचे पप्पू कोळी व किसान मोर्चाचे पदाधिकारी आदी वर्गांची एकत्रित बैठक झाली.

यावेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.

या बैठकीत प्रत्येकाने उजनी धरणासंबंधी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना जनहितचे प्रभाकर देशमुख म्हणाले की, पालकमंत्र्यांनी पळविलेले पाणी हे जिल्ह्याच्या हक्काचे आहे. त्यांनी येथील सर्वांची दिशाभूल करीत इंदापूरच्या फायद्यासाठी पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय मंजूर करून घेतला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही हात असल्याने त्यांच्या पक्षाचे नेते याविरुद्ध काही करू शकणार नाहीत, म्हणून आम्ही सर्व जण एकत्र येत उजनी धरणाबाबत लढा उभा करीत असल्याचे स्पष्ट केले.

धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी याबाबत लवकरच जनहित याचिका दाखल करत असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

-----

महाराष्ट्रदिनी लढा उभारणार

शेतकरी नेते अतुल खुपसे पाटील बोलताना म्हणाले की, उजनी धरण म्हणजे सर्वांच्या आत्मीयतेचा विषय आहे. त्यात या निर्णयाच्या मागे स्वतः अजित पवार हे अग्रस्थानी असल्याने करमाळ्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी याबाबत जी भूमिका घेतली आहे, ती चुकीची आहे. ते म्हणतात की, मी पवार साहेबांच्या मर्जीतला असून, त्यांचा कोणताही शब्द मोडत नाही. यावरून त्यांनी जर यावर त्यांना गप बसण्याचे आदेश दिले, तर ते काहीही करू शकणार नाहीत. म्हणून सर्वसामान्य नागरिकांनाच या लढ्यात उतरावे लागणार आहे. म्हणून १ मे या महाराष्ट्रदिनी आम्ही उजनीसंबंधी मोठा लढा उभा करत आहोत. त्यास सर्वांनी सहकार्य करावे.

----

२७ कुर्डूवाडी-उजनी बैठक १,२,३

पालकमंत्र्यांनी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला घेतल्याच्या निषेधार्थ कुर्डू येथे आयोजित बैठकीला उपस्थित शेतकरी संघटनेचे नेते, पदाधिकारी.