शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

तऱ़़...साखरेच्या दरालाही हमी भाव द्या, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मांडली भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:17 IST

शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत,   शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकर्नाटक सरकारचे अनुकरण करावेशासनानेही एफ.आर.पी. पेक्षा अधिकची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावीदरासाठी दरवर्षीच आंदोलन करावे लागणे बरोबर नाही

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत,   शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.सध्या उसाची पहिली उचल किती देणार?, हा प्रश्न उपस्थित करुन शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करीत आहे. साखर कारखानदारांनी शेतकºयांचा चार पैसे फायदा होईस असा उसाला दर देण्यासाठी साखरेचा दरही निश्चित असला पाहिजे असे साखर कारखानदारांचे मत आहे. मागील वर्षी साखरेचा जो दर होता तो याहीवर्षी मिळेल असे सांगता येत नाही. यावर्षी साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या दीड पट होईल, त्यामुळे साखरेचा दर कमी होणार नाही, याची खात्री कोण देणार? असे कारखानदारांचे म्हणणे आहे. आम्ही एफ.आर.पी. तर देणारच आहोत, त्यासाठी बांधील असल्याचे लोकनेते शुगरचे संस्थापक माजी आ. राजन पाटील, सिद्धनाथचे अध्यक्ष माजी आ. दिलीप माने व युटोपियनचे अध्यक्ष उमेश परिचारक म्हणाले.-------------------संघटनांनी शासनाशी भांडावेजसे ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कारखान्याच्या यंत्रणेशी भांडतात तसे साखर दरासाठी शासनाशीही भांडावे तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. अधिक दर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकºयांची असणे चुकीचे नाही परंतु दरासाठी दरवर्षीच आंदोलन करावे लागणे बरोबर नाही, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली. --------------------कर्नाटक सरकारचे अनुकरण करावेमागील वर्षी ऊस दर कमी झाला त्यावेळी कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने प्रतिटन २०० रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले होते. अशाच पद्धतीने महाराष्टÑ शासनानेही एफ.आर.पी. पेक्षा अधिकची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी माजी. आ. राजन पाटील व दिलीप माने यांनी केली.-------------------साखर उताराच कमी दाखवून काही कारखानदार शेतकºयांची लूट करीत आहेत. याशिवाय वजनकाटेही संशयास्पद आहेत. उत्पादीत साखरेला खाण्यासाठी व उद्योगासाठीचे दर वेगवेगळे ठेवले तर शेतकºयांना अधिक दर देता येईल. - प्रभाकर देशमुख,जनहित शेतकरी संघटना