शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

तऱ़़...साखरेच्या दरालाही हमी भाव द्या, सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मांडली भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:17 IST

शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत,   शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देकर्नाटक सरकारचे अनुकरण करावेशासनानेही एफ.आर.पी. पेक्षा अधिकची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावीदरासाठी दरवर्षीच आंदोलन करावे लागणे बरोबर नाही

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत,   शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक्त केले आहे.सध्या उसाची पहिली उचल किती देणार?, हा प्रश्न उपस्थित करुन शेतकरी संघटना आंदोलनाची भाषा करीत आहे. साखर कारखानदारांनी शेतकºयांचा चार पैसे फायदा होईस असा उसाला दर देण्यासाठी साखरेचा दरही निश्चित असला पाहिजे असे साखर कारखानदारांचे मत आहे. मागील वर्षी साखरेचा जो दर होता तो याहीवर्षी मिळेल असे सांगता येत नाही. यावर्षी साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या दीड पट होईल, त्यामुळे साखरेचा दर कमी होणार नाही, याची खात्री कोण देणार? असे कारखानदारांचे म्हणणे आहे. आम्ही एफ.आर.पी. तर देणारच आहोत, त्यासाठी बांधील असल्याचे लोकनेते शुगरचे संस्थापक माजी आ. राजन पाटील, सिद्धनाथचे अध्यक्ष माजी आ. दिलीप माने व युटोपियनचे अध्यक्ष उमेश परिचारक म्हणाले.-------------------संघटनांनी शासनाशी भांडावेजसे ऊसदरासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कारखान्याच्या यंत्रणेशी भांडतात तसे साखर दरासाठी शासनाशीही भांडावे तरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. अधिक दर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकºयांची असणे चुकीचे नाही परंतु दरासाठी दरवर्षीच आंदोलन करावे लागणे बरोबर नाही, अशी भूमिका कारखानदारांनी मांडली. --------------------कर्नाटक सरकारचे अनुकरण करावेमागील वर्षी ऊस दर कमी झाला त्यावेळी कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारने प्रतिटन २०० रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले होते. अशाच पद्धतीने महाराष्टÑ शासनानेही एफ.आर.पी. पेक्षा अधिकची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी माजी. आ. राजन पाटील व दिलीप माने यांनी केली.-------------------साखर उताराच कमी दाखवून काही कारखानदार शेतकºयांची लूट करीत आहेत. याशिवाय वजनकाटेही संशयास्पद आहेत. उत्पादीत साखरेला खाण्यासाठी व उद्योगासाठीचे दर वेगवेगळे ठेवले तर शेतकºयांना अधिक दर देता येईल. - प्रभाकर देशमुख,जनहित शेतकरी संघटना