शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

अवकाळी पावसाने द्राक्ष, ज्वारीला अवकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST

रविवारी दुपारनंतर, तर काही ठिकाणी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणी झालेल्या ज्वारी, ...

रविवारी दुपारनंतर, तर काही ठिकाणी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणी झालेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले. पावसाच्या थेंबामुळे काढून जमिनीवर टाकलेल्या ज्वारीची कणसे काळी पडण्याची शक्यता आहे. जमिनीवर पडलेल्या ज्वारीच्या कणसांमध्ये पावसाच्या थेंबाबरोबर माती मिसळण्याची अधिक शक्यता आहे. दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती, तरीही आधीच ज्वारीची काढणी केलेल्या शेतकऱ्यांना या अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसला.

सोमवारी सायंकाळी सोलापूर शहर परिसरात दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री विजांचा कडकडाट सुरू होता. तब्बल २० मिनिटे हा पाऊस सुरू होता. शहराभोवताली शेळगी, कारंबा, हत्तूर, देगाव, तिऱ्हे आदी गावांच्या परिसरातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. 25 टक्के द्राक्ष बागा आता काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. द्राक्ष घडावर पाऊस पडल्याने घडांत पाणी साठून मणी तडकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

------

कडबा काळा पडण्याची शक्यता

ज्वारीची काढणी करून ती जमिनीवर टाकलेल्या कडव्यावर पाऊस पडल्यास हा कडबा काळा पडतो. काळा पडलेला कडबा जनावरांसाठी खाण्यालायक नसतो. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी ज्वारीची पेरणी उशिराने झाली होती. अशा पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. ज्वारीची कणसे मोडून टाकण्यात आली आहेत. पावसाने या कणसामध्ये पाणी साठल्यास संपूर्ण ज्वारीची रास खराब होऊ शकते.

-----

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु त्याची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. तालुका कृषी कार्यालयांकडून माहिती संकलित केली जात आहे.

- रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर.

-------

भाजीपाल्याचे नुकसान

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसला आहे. कोथिंबीर, पालक, मेथी भाज्यांचे नुकसान झाले आहे. काढणी करून पेंढ्यांची बांधणी करण्याच्या अवस्थेत असलेल्या भाज्या खराब झाल्या. त्यामुळे मंगळवारी पालेभाज्यांची आवक काहीशी मंदावली होती.

------

कांद्याची नासाडी

अचानक पाऊस पडल्याने रानात टाकलेल्या कांद्याचे नुकसान झाले. पात कापलेल्या कांद्यावर या पावसाचा जास्त परिणाम होणार आहे. पाऊस पडल्याने कांद्यावर पाणी साठल्याने हा कांदा नासून खराब होण्याची भीती अधिक आहे. गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.

-----