शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

अवकाळी पावसाने द्राक्ष, ज्वारीला अवकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST

रविवारी दुपारनंतर, तर काही ठिकाणी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणी झालेल्या ज्वारी, ...

रविवारी दुपारनंतर, तर काही ठिकाणी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणी झालेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले. पावसाच्या थेंबामुळे काढून जमिनीवर टाकलेल्या ज्वारीची कणसे काळी पडण्याची शक्यता आहे. जमिनीवर पडलेल्या ज्वारीच्या कणसांमध्ये पावसाच्या थेंबाबरोबर माती मिसळण्याची अधिक शक्यता आहे. दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती, तरीही आधीच ज्वारीची काढणी केलेल्या शेतकऱ्यांना या अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसला.

सोमवारी सायंकाळी सोलापूर शहर परिसरात दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री विजांचा कडकडाट सुरू होता. तब्बल २० मिनिटे हा पाऊस सुरू होता. शहराभोवताली शेळगी, कारंबा, हत्तूर, देगाव, तिऱ्हे आदी गावांच्या परिसरातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. 25 टक्के द्राक्ष बागा आता काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. द्राक्ष घडावर पाऊस पडल्याने घडांत पाणी साठून मणी तडकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

------

कडबा काळा पडण्याची शक्यता

ज्वारीची काढणी करून ती जमिनीवर टाकलेल्या कडव्यावर पाऊस पडल्यास हा कडबा काळा पडतो. काळा पडलेला कडबा जनावरांसाठी खाण्यालायक नसतो. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी ज्वारीची पेरणी उशिराने झाली होती. अशा पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. ज्वारीची कणसे मोडून टाकण्यात आली आहेत. पावसाने या कणसामध्ये पाणी साठल्यास संपूर्ण ज्वारीची रास खराब होऊ शकते.

-----

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु त्याची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. तालुका कृषी कार्यालयांकडून माहिती संकलित केली जात आहे.

- रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर.

-------

भाजीपाल्याचे नुकसान

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसला आहे. कोथिंबीर, पालक, मेथी भाज्यांचे नुकसान झाले आहे. काढणी करून पेंढ्यांची बांधणी करण्याच्या अवस्थेत असलेल्या भाज्या खराब झाल्या. त्यामुळे मंगळवारी पालेभाज्यांची आवक काहीशी मंदावली होती.

------

कांद्याची नासाडी

अचानक पाऊस पडल्याने रानात टाकलेल्या कांद्याचे नुकसान झाले. पात कापलेल्या कांद्यावर या पावसाचा जास्त परिणाम होणार आहे. पाऊस पडल्याने कांद्यावर पाणी साठल्याने हा कांदा नासून खराब होण्याची भीती अधिक आहे. गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.

-----