शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अवकाळी पावसाने द्राक्ष, ज्वारीला अवकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST

रविवारी दुपारनंतर, तर काही ठिकाणी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणी झालेल्या ज्वारी, ...

रविवारी दुपारनंतर, तर काही ठिकाणी सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाने काढणी झालेल्या ज्वारी, गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले. पावसाच्या थेंबामुळे काढून जमिनीवर टाकलेल्या ज्वारीची कणसे काळी पडण्याची शक्यता आहे. जमिनीवर पडलेल्या ज्वारीच्या कणसांमध्ये पावसाच्या थेंबाबरोबर माती मिसळण्याची अधिक शक्यता आहे. दोन दिवस पावसाचे वातावरण असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती, तरीही आधीच ज्वारीची काढणी केलेल्या शेतकऱ्यांना या अवेळी आलेल्या पावसाचा फटका बसला.

सोमवारी सायंकाळी सोलापूर शहर परिसरात दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री विजांचा कडकडाट सुरू होता. तब्बल २० मिनिटे हा पाऊस सुरू होता. शहराभोवताली शेळगी, कारंबा, हत्तूर, देगाव, तिऱ्हे आदी गावांच्या परिसरातील द्राक्षबागांचे नुकसान झाले. 25 टक्के द्राक्ष बागा आता काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. द्राक्ष घडावर पाऊस पडल्याने घडांत पाणी साठून मणी तडकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे.

------

कडबा काळा पडण्याची शक्यता

ज्वारीची काढणी करून ती जमिनीवर टाकलेल्या कडव्यावर पाऊस पडल्यास हा कडबा काळा पडतो. काळा पडलेला कडबा जनावरांसाठी खाण्यालायक नसतो. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी ज्वारीची पेरणी उशिराने झाली होती. अशा पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. ज्वारीची कणसे मोडून टाकण्यात आली आहेत. पावसाने या कणसामध्ये पाणी साठल्यास संपूर्ण ज्वारीची रास खराब होऊ शकते.

-----

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे. पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु त्याची अधिकृत आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. तालुका कृषी कार्यालयांकडून माहिती संकलित केली जात आहे.

- रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर.

-------

भाजीपाल्याचे नुकसान

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका भाजीपाल्याला बसला आहे. कोथिंबीर, पालक, मेथी भाज्यांचे नुकसान झाले आहे. काढणी करून पेंढ्यांची बांधणी करण्याच्या अवस्थेत असलेल्या भाज्या खराब झाल्या. त्यामुळे मंगळवारी पालेभाज्यांची आवक काहीशी मंदावली होती.

------

कांद्याची नासाडी

अचानक पाऊस पडल्याने रानात टाकलेल्या कांद्याचे नुकसान झाले. पात कापलेल्या कांद्यावर या पावसाचा जास्त परिणाम होणार आहे. पाऊस पडल्याने कांद्यावर पाणी साठल्याने हा कांदा नासून खराब होण्याची भीती अधिक आहे. गाफील राहिलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.

-----