शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उजनीतील पाणी वाचवण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST

भीमानगर : उजनी धरणातील हक्काचे पाणी वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ठराव ...

भीमानगर : उजनी धरणातील हक्काचे पाणी वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ठराव करावेत, असे आवाहन रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील यांनी केले.

उजनी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रभाकर देशमुख यांच्या जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यास रयत क्रांतीने पाठिंबा दिला. याप्रसंगी आंदोलनकर्त्यांना संबोधित असाताना ग्रामपंचायतींनी ठराव करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

उजनीतील सांडपाणी मोजमाप करण्याची यंत्रणा शासनाकडे नाही. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सांडपाणी किती जमा होते याची आकडेवारी जलसंपदा विभागाकडे नाही. तरीसुद्धा सांडपाण्याच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी मंजुरी दिली आहे. सध्या मंजूर केलेला पाण्याचा आदेश सरकारने त्वरित रद्द करावा, अशी मागणी रयत क्रांतीने केला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहार संघटनेचे संघटक विठ्ठल मस्के, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, रयतचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत करळे, आप्पा गवळी, अमोल ऊबाळे, धवल पाटील उपस्थित होते.