शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

अ‍ॅट्रॉसिटी कोर्ट स्थापण्यास सरकार उदासिन

By admin | Updated: July 17, 2017 15:28 IST

बहुजन फाऊंडेशनची चळवळ : सहा महिने उलटले तरी प्रतिज्ञापत्र दाखल नाही

 
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 17 -दलित अत्याचार प्रतिबंधात्मक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यासंदर्भातील ४५ हजार खटले राज्यात प्रलंबित आहेत. शिवाय आरोपसिद्धीचे प्रमाणही आज अखेर केवळ ०.८० टक्के इतकेच आहे. या स्थितीत अ‍ॅट्रॉसिटीच्या केसेससाठी सहा महसुली विभागात प्रत्येकी एक विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय सहावर्षापूर्वी होऊनही अद्याप ते स्थापन झालेले नाहीत. 
याबद्दल बहुजन फाऊंडेशनने संताप व्यक्त केला असून, मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देऊनही गेल्या सहा महिन्यात ते दाखल केलेले नाही. सरकारच्या उदासिन धोरणाविरुद्ध फाऊंडेशच्यावतीने राज्यभर दलितांमध्ये जनजागरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
 
राज्य सरकारने ५ नोव्हेंबर २०११ रोजी अ‍ॅट्रॉसिटीच्या खटल्यांसाठी स्वतंत्र सहा न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ७८ न्यायालयीन पदे भरणे आणि अन्य खर्चासाठी ९५.१४ लाख रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारला न्यायालये स्थापन करण्यासाठी ५० टक्के निधी, १६ कोटी रूपये २ नोव्हेंबर २०१७ रोजी दिले. निधीची संपूर्ण तरतूद झाली असतानाही यासंदर्भात कोणतीही कार्यवाही स्थापन झाली नसल्याने बहुजन फाऊंडेशन आणि अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याची माहिती याचिकाकर्त्या सुरेखा कांबळे यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.  या याचिकेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह राज्य सरकार आणि केंद्राच्या  विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना प्रतिवादी करण्यात आले.
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लुर व न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होऊन १६ जानेवारी २०१७ रोजी मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र सरकारने अद्याप ते दाखल केले नाही. सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल न करून न्यायालयाचा अवमान तर केलाच आहे. शिवाय दलितांवर अन्यायाचा आघात केलेला आहे, असा आरोप कांबळे यांनी केला. सरकारच्या या धोरणाविरोधात राज्यभर जनजागरणाची मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. या पत्रकार परिषदेस पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ इंगळे, रिपब्लिकन सेनेचे सिध्दार्थ कांबळे, डॉ. धम्मपाल माशाळकर, अंजना गायकवाड आदी उपस्थित होते.
 
जीवितास धोका; पण संरक्षण नाही!
अ‍ॅट्रॉसिटी केसेससाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन व्हावेत, यासाठी राज्यभर जनजागरण दौरा करणार आहे. हा दौरा करताना अ‍ॅट्रॉसिटीच्या कारवाईला विरोध असणाºया लोकांकडून जीवितास धोका आहे. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे संरक्षणाची मागणी; पण दीड महिना उलटून गेला तरी मला संरक्षण दिले नाही. संरक्षण दिले नाही तरी सरकारच्या धोरणाविरोधात आपण चळवळ उभी करणार आहोत, असे बहुजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा कांबळे यांनी स्पष्ट केले.