शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

सरकारने आगीशी खेळू नये; बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करावा! -राजू शेट्टी

By संताजी शिंदे | Updated: April 29, 2023 14:58 IST

"आंदोलकांवर केलेला बेछूट लाठीमार 'जनरल डायरला'ही लाजवणारा"

संताजी शिंदे, सोलापूर: बारसू रिफायनरी प्रकरणी स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तो प्रकल्प रद्द करावा. स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत,  त्यामुळे  सरकारने आगीशी खेळू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुट्टीवर पाठवून राज्य सरकारने आंदोलकावर केलेला बेछूट लाठीमार हा जनरल डायरलाही लाजवणारा आहे. हा अन्याय शेतकरी कधीही खपवून घेणार नाही. आतला-बाहेरचा असा शेतकऱ्यात भेदाभेद  करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शनिवार ते सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, युवक अध्यक्ष विजय रणदिवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राजू शेट्टी म्हणाले की, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांची नाळ ही शेती जोडली गेली आहे. त्यांचे वडील -भाऊ काळया आईची सेवा करतात. बारसू आंदोलनादरम्यान स्थानिक शेतकरी-महिलांवर निर्दयीपणे बेछूट लाटी हल्ला करताना शेतकरी पुत्र असणाऱ्या पोलिसांना मायेचा उमाळा कसा फुटला नाही ? असा प्रश्न उपस्थित केला.

स्थानिक व शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास बाहेरच्या लोकांचा पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो .त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही छातीची ढाल करून अन्याय विरोधात शेतकऱ्याच्या बाजूने उभी असते. संकट समयी आम्ही शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही. बारसू येथील शेतकरी चीन, अमेरिकेचा नाही. तेथील स्थानिकांच्या व शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी असणार असल्याचे यावेळी शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पRaju Shettyराजू शेट्टी