शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोडसे, आवताडे, शिंदेचा करिश्मा चाललाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:17 IST

मतदारांनी त्यांना या निवडणुकीत साफ नाकारल्याचे चित्र आहे. पंढरपूर पोटनिवडणूक व मागील विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला ...

मतदारांनी त्यांना या निवडणुकीत साफ नाकारल्याचे चित्र आहे. पंढरपूर पोटनिवडणूक व मागील विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. मात्र मागील वेळी सेना-भाजपमुळे ही जागा रयतक्रांतीला सुटली. त्यामुळे त्यांना पक्षादेश मानत माघार घ्यावी लागली. तर यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याने पक्षाकडून त्यांना उमेदवारी घेता आली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविली. याअगोदर गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलने, मोंर्चे, पाणीप्रश्न, घरोघरी भेट देत त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली. याच जोरावर त्यांना चांगली मते मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र या निवडणुकीत केवळ १६०७ मते मिळाल्याने मोठी नामुष्की पत्करावी लागली.

स्वाभिमानीकडून राज्य सरकार शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देत नाहीत. थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट करत आहे, अशा विविध मागण्या समोर आणत आघाडी धर्माचे पालन न करता शेवटच्या टप्प्यात निवडणुकीत अर्ज दाखल करत तो शेवटपर्यंत काढला नाही. प्रचारादरम्यान राजू शेट्टींनी स्वत: तळ ठोकून प्रचार केला. दोन्ही प्रमुख साखर कारखानदार उमेदवारांसह राज्य सरकारवर आगपाखड केली. त्यामुळे त्यांनाही शेतकऱ्यांची मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात असताना केवळ १०२७ मते मिळाली. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून जनमानसात संघटनेच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे मानले जात आहे.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी घरातील व त्यांच्या काही सहकारी संस्थांमधील मतभेद ऐन निवडणुकीत चव्हाट्यावर आणत भावबंदकी साधण्याचा प्रयत्न केला. सिद्धेश्वर आवताडे हे समाधान आवताडेंसाठी मोठी डोकेदुखी ठरतील, अशी अपेक्षा प्रारंभी व्यक्त केली जात होती. मात्र निवडणुकीत त्यांना मिळालेली २९५५ ही मते त्यांच्या मर्यादा स्पष्ट करणारी ठरली आहेत. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी मोठा आटापिटा, गाजावाजा करून निवडणूक रिंगणात उड्या घेतल्या. मात्र निवडणुकीत त्यांचा कोणताही करिश्मा चालला नसल्याचे चित्र आहे. मतदारांनी त्यांना साफ नाकारले असून भविष्यात निवडणुका लढविताना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.