शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

गोडसे, आवताडे, शिंदेचा करिश्मा चाललाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:17 IST

मतदारांनी त्यांना या निवडणुकीत साफ नाकारल्याचे चित्र आहे. पंढरपूर पोटनिवडणूक व मागील विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला ...

मतदारांनी त्यांना या निवडणुकीत साफ नाकारल्याचे चित्र आहे. पंढरपूर पोटनिवडणूक व मागील विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होत्या. मात्र मागील वेळी सेना-भाजपमुळे ही जागा रयतक्रांतीला सुटली. त्यामुळे त्यांना पक्षादेश मानत माघार घ्यावी लागली. तर यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचा घटकपक्ष असल्याने पक्षाकडून त्यांना उमेदवारी घेता आली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविली. याअगोदर गेल्या काही महिन्यांपासून विविध आंदोलने, मोंर्चे, पाणीप्रश्न, घरोघरी भेट देत त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली. याच जोरावर त्यांना चांगली मते मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र या निवडणुकीत केवळ १६०७ मते मिळाल्याने मोठी नामुष्की पत्करावी लागली.

स्वाभिमानीकडून राज्य सरकार शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देत नाहीत. थकीत वीजबिलापोटी वीज कनेक्शन कट करत आहे, अशा विविध मागण्या समोर आणत आघाडी धर्माचे पालन न करता शेवटच्या टप्प्यात निवडणुकीत अर्ज दाखल करत तो शेवटपर्यंत काढला नाही. प्रचारादरम्यान राजू शेट्टींनी स्वत: तळ ठोकून प्रचार केला. दोन्ही प्रमुख साखर कारखानदार उमेदवारांसह राज्य सरकारवर आगपाखड केली. त्यामुळे त्यांनाही शेतकऱ्यांची मते मिळतील, अशी शक्यता वर्तविली जात असताना केवळ १०२७ मते मिळाली. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून जनमानसात संघटनेच्या विश्वासार्हतेला तडा गेल्याचे मानले जात आहे.

भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी घरातील व त्यांच्या काही सहकारी संस्थांमधील मतभेद ऐन निवडणुकीत चव्हाट्यावर आणत भावबंदकी साधण्याचा प्रयत्न केला. सिद्धेश्वर आवताडे हे समाधान आवताडेंसाठी मोठी डोकेदुखी ठरतील, अशी अपेक्षा प्रारंभी व्यक्त केली जात होती. मात्र निवडणुकीत त्यांना मिळालेली २९५५ ही मते त्यांच्या मर्यादा स्पष्ट करणारी ठरली आहेत. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी मोठा आटापिटा, गाजावाजा करून निवडणूक रिंगणात उड्या घेतल्या. मात्र निवडणुकीत त्यांचा कोणताही करिश्मा चालला नसल्याचे चित्र आहे. मतदारांनी त्यांना साफ नाकारले असून भविष्यात निवडणुका लढविताना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.