शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

हजारो भक्तांच्या उपस्थितीत रामानंद सरस्वती महाराजांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST

यावेळी त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांना त्यांच्या गादीवर बसवून अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यातून ...

यावेळी त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांना त्यांच्या गादीवर बसवून अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यातून ५० हजाराच्या सुमारास भाविकांची उपस्थिती होती. महाराजांच्या अंत्यसंस्कार समाधीनंतरही दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली.

गेली ३६ वर्षांपासून त्यांनी अन्नग्रहण केलेले नव्हते. यादरम्यान केवळ दूध व विविध फलाहार यांचे त्यांनी सेवन केले. मागील काही वर्षी पंढरपूर येथे त्यांनी एक भव्य मठही उभारला आहे. यावेळी अनेक लाेकांना व वारकऱ्यांना अन्नदानाची साेय त्यांनी केलेली आहे. चिंचगाव टेकडी हा परिसर पर्यटनदृष्ट्या अत्यंत प्रेक्षणीय झालेला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्या येथे थांबतात. त्यांचे लाखाे भक्त आहेत. त्यांची निधन वार्ता समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कोराेनाचा वाढता प्रभाव पाहता भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दुपारी हाेणारा अंत्यविधी साेहळा मंदिर प्रशासनाच्या वतीने सकाळी सात वाजण्याच्या आत उरकण्यात आला. यावेळी सत्संग आश्रम ट्रस्ट, ग्रामस्थ व पोलिसांनी अंत्यसंस्कार विधी व्यवस्थित पार पडावेत म्हणून परिश्रम घेतले.

...................

रामानंद महाराजांचा जीवनप्रास

रामानंद सरस्वती महाराज मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते. पंढरपूरला एका वारीनिमित्त आले होते. त्यानंतर चिंचगाव येथील उंच डोंगरासारखी टेकडी पाहून तेथे ते १९६२ साली ते महादेव टेकडीच्या डोंगराळ भागात वास्तव्यास आले हाेते. त्यावेळी तिथे लहान महादेव मंदिर हाेते. सन २००५ साली त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून दगडात मोठे मंदिर व सभागृह बांधले. याचे नंतर त्यांनी ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रात रूपांतर केलेले आहे. याचबरोबर यात्री निवासासह इतर माेठ्या सुखसुविधाही याठि काणी उपलब्ध केलेल्या आहेत. महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, कर्नाटकी यासारख्या एकूण सोळा भाषा लिहिता, वाचता येत होत्या.

............

अंधश्रद्धेला कधीही दिला नाही थारा

गेली ५९ वर्षांपासून ते चिंचगाव टेकडी येथे वास्तव्यास होते. नागपूर येथील तपकिरे महाराज यांच्या नावाने चिंचगाव ते पंढरपूर अशी पायी दिंडी त्यांच्या अधिपत्याखाली सुरू होती. दर पौर्णिमेस होणारा सत्संग सप्ताहही त्यांनीच सुरू केला आहे. मितभाषी असलेल्या रामानंद महाराजांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. त्यांच्या वास्तव्यामुळे संपूर्ण परिसराला आध्यत्मिक क्षेत्राचा वारसा मिळाला होता.

.........

फोटो १४रामानंद महाराज

140921\img-20210914-wa0155.jpg

चिंचगाव टेकडी येथे प पू रामानंद सरस्वती महाराजांना समाधी देताना विधी करताना साधक व भाविक