शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हजारो भक्तांच्या उपस्थितीत रामानंद सरस्वती महाराजांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST

यावेळी त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांना त्यांच्या गादीवर बसवून अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यातून ...

यावेळी त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांना त्यांच्या गादीवर बसवून अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्यातून ५० हजाराच्या सुमारास भाविकांची उपस्थिती होती. महाराजांच्या अंत्यसंस्कार समाधीनंतरही दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली.

गेली ३६ वर्षांपासून त्यांनी अन्नग्रहण केलेले नव्हते. यादरम्यान केवळ दूध व विविध फलाहार यांचे त्यांनी सेवन केले. मागील काही वर्षी पंढरपूर येथे त्यांनी एक भव्य मठही उभारला आहे. यावेळी अनेक लाेकांना व वारकऱ्यांना अन्नदानाची साेय त्यांनी केलेली आहे. चिंचगाव टेकडी हा परिसर पर्यटनदृष्ट्या अत्यंत प्रेक्षणीय झालेला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्या येथे थांबतात. त्यांचे लाखाे भक्त आहेत. त्यांची निधन वार्ता समजताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कोराेनाचा वाढता प्रभाव पाहता भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने मंगळवारी दुपारी हाेणारा अंत्यविधी साेहळा मंदिर प्रशासनाच्या वतीने सकाळी सात वाजण्याच्या आत उरकण्यात आला. यावेळी सत्संग आश्रम ट्रस्ट, ग्रामस्थ व पोलिसांनी अंत्यसंस्कार विधी व्यवस्थित पार पडावेत म्हणून परिश्रम घेतले.

...................

रामानंद महाराजांचा जीवनप्रास

रामानंद सरस्वती महाराज मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते. पंढरपूरला एका वारीनिमित्त आले होते. त्यानंतर चिंचगाव येथील उंच डोंगरासारखी टेकडी पाहून तेथे ते १९६२ साली ते महादेव टेकडीच्या डोंगराळ भागात वास्तव्यास आले हाेते. त्यावेळी तिथे लहान महादेव मंदिर हाेते. सन २००५ साली त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून दगडात मोठे मंदिर व सभागृह बांधले. याचे नंतर त्यांनी ब दर्जाच्या तीर्थक्षेत्रात रूपांतर केलेले आहे. याचबरोबर यात्री निवासासह इतर माेठ्या सुखसुविधाही याठि काणी उपलब्ध केलेल्या आहेत. महाराजांना मराठी, इंग्रजी, हिंदी, तमिळ, कर्नाटकी यासारख्या एकूण सोळा भाषा लिहिता, वाचता येत होत्या.

............

अंधश्रद्धेला कधीही दिला नाही थारा

गेली ५९ वर्षांपासून ते चिंचगाव टेकडी येथे वास्तव्यास होते. नागपूर येथील तपकिरे महाराज यांच्या नावाने चिंचगाव ते पंढरपूर अशी पायी दिंडी त्यांच्या अधिपत्याखाली सुरू होती. दर पौर्णिमेस होणारा सत्संग सप्ताहही त्यांनीच सुरू केला आहे. मितभाषी असलेल्या रामानंद महाराजांनी अंधश्रद्धेला कधीही थारा दिला नाही. त्यांच्या वास्तव्यामुळे संपूर्ण परिसराला आध्यत्मिक क्षेत्राचा वारसा मिळाला होता.

.........

फोटो १४रामानंद महाराज

140921\img-20210914-wa0155.jpg

चिंचगाव टेकडी येथे प पू रामानंद सरस्वती महाराजांना समाधी देताना विधी करताना साधक व भाविक