शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

फुलाऱ्याला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:20 IST

दक्षिण सोलापूर : भंडारकवठे येथील श्री महासिद्ध मंदिराच्या फुलाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर छत्तीस तास उलटून गेले तरी कोणाविरुद्धही गुन्हा दाखल ...

दक्षिण सोलापूर : भंडारकवठे येथील श्री महासिद्ध मंदिराच्या फुलाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर छत्तीस तास उलटून गेले तरी कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झाला नाही. जखमी पिरप्पा फुलारी शुद्धीवर आला असून, सध्या तो बोलण्याच्या मनःस्थितीत नाही. पोलीस मात्र घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत.

सोमवारी पहाटे पूजेसाठी बेलपत्र आणि फुले आणायला गेलेल्या फुलाऱ्याला अज्ञात इसमाने तोंडात कापडाचा बोळा कोंबून हातपाय बांधले आणि बेदम मारहाण केली होती. या घटनेमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलिसांनीही याप्रकरणी कोणावर गुन्हा नोंदवलेला नाही. जखमी पिरप्पा फुलारी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. मंगळवारी तो शुद्धीवर आला; परंतु बोलण्याची त्याची मन:स्थिती नाही.

गुढीपाडव्याचा दिवस असून, श्री महासिद्ध मंदिरात पुजाऱ्यांनीच पूजा बांधली. मंदिर स्थापनेच्या इतिहासात फुलाऱ्यांशिवाय प्रथमच अशी पूजा बांधण्यात आली. फुलारी आणि पुजारी या मंदिराच्या सेवाधाऱ्यांत भक्तांकडून मिळणाऱ्या दक्षिणा, कोरडा शिधा यावरून अनेक महिन्यांपासून वाद होता. प्रकरण पोलीस ठाण्यात गेले, मात्र वाद मिटला नाही. सोमवारच्या घटनेशी काही जण या वादाचा संबंध असल्याची चर्चा करीत आहेत तर पिरप्पा फुलारी पूर्वी सावळेश्वर येथे राहत होते. ग्रामस्थ तेथील वादाचासंदर्भ जोडत आहेत. पोलिसांना फुलारी तोंड कधी उघडणार याची प्रतीक्षा आहे.

तरीही मारेकऱ्यांनी गाठलेच

पिरप्पा फुलारी यांनी दीड महिन्यापूर्वी मंद्रूप पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची तक्रार दिली होती. जीविताला धोका असल्याची त्यांना भीती होती. त्यामुळेच रोज पहाटे देवाला फुले आणि बेलपत्र आणण्यासाठी नव्या शिवारात जात होते. एकाच दिशेला जाण्याचे टाळत असत तरीही सोमवारी त्यांना मारेकर्‍यांनी गाठलेच.

----

राजकीय वादाची झालर

भंडारकवठे ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत महासिद्ध मंदिराचे पुजारी एका राजकीय गटाचे समर्थक होते, तर फुलारी समाजाने दुसऱ्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. आपसातील वाद मिटत नसल्याने या दोन्ही गटांनी राजकीय नेत्यांशी जवळीक साधली होती. त्यामुळेही त्यांच्यातील वितुष्ट आणखी वाढले असावे, असाही तर्क लढवला जात आहे.

-----