शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वारीत भाविकांचे संवाद ऐकून अवगत केल्या चार भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:40 IST

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक शिकतात अनेक भाषा

ठळक मुद्देढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी देशातील कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यासह देश-विदेशातून लाखो भाविक येतात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार हे त्या त्या प्रांतातील भाविकांना त्यांच्या भाषेत मंदिरातील नियम, अटी समजावून सांगतात भाविकांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य समुपदेशन केल्याने किरकोळ कारणावरुन होणारे वाद थांबतात

सचिन कांबळे

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी बहुभाषिक येतात. त्यांचे विविध भाषेतील बोल सतत कानावर पडतात. ते बोल ऐकून ऐकून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषा अवगत झाल्याची माहिती सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार यांनी सांगितले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रज्ञा येलमवार या मागील १० वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कमी वेळेत चांगले दर्शन घडवण्याचे काम त्या करतात. 

श्री विठ्ठलाचा महिमा देशभर प्रसिद्ध असल्याकारणाने देशाच्या विविध कानाकोपºयातून भाविक दर्शनासाठी येतात. यामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक विविध भाषिक असतात़ प्रत्येक भाविकाला मराठी भाषा समजत नाही. यामुळे पंढरपुरात आल्यानंतर त्यांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागते. त्याची गैरसोय होत असते.

मंदिरात आल्यानंतर दर्शन रांगेत भाविकांची अनेकवेळा तू-तू मैं-मैं होत असते,परंतु सुरक्षा कर्मचारी प्रज्ञा येमलवार यांनी मंदिरात येणाºया भाविकांच्या माध्यमातून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड या भाषांचे पुरेसे ज्ञान अवगत केले आहे. यामुळे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी भागातील येणाºया भाविकांशी संवाद साधताना आता अडचणी येत नसल्याचे त्या सांगत होत्या़

त्यांच्याच भाषेत माहिती दिल्याने भाविक समाधानी- पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी देशातील कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यासह देश-विदेशातून लाखो भाविक येतात. त्यांचे श्रद्धास्थान एक असले तरी भाषा प्रांत मात्र वेगवेगळी आहेत़ त्यामुळे पंढरपुरात आल्यानंतर येथील मराठी भाषा मंदिराचे नियम, अटी त्यांना समजणे अवघड असते. भाषा न येण्यामुळे अनेकदा वादही उद्भवतात; मात्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा रक्षक प्रज्ञा येमलवार हे त्या त्या प्रांतातील भाविकांना त्यांच्या भाषेत मंदिरातील नियम, अटी समजावून सांगतात. भाविकांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य समुपदेशन केल्याने किरकोळ कारणावरुन होणारे वाद थांबतात़ शिवाय भाविकही दर्शन घेऊन समाधानाने जातात़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी