शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

पाणी पळवणे म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST

या निर्णयामुळे उन्हाळी पाणी आवर्तन शेतीला मिळणार नाही. मे महिन्यातील पाणी आवर्तन शेती पिकासाठी मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड ...

या निर्णयामुळे उन्हाळी पाणी आवर्तन शेतीला मिळणार नाही. मे महिन्यातील पाणी आवर्तन शेती पिकासाठी मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. तरी आघाडी सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेत ‘हक्काचं पाणी बचाव आंदोलन’ उभे करणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील अनेक अपूर्ण उपसा सिंचन योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकल्पावर बार्शी उपसा सिंचन योजना २.५९, सीना माढा उपसा सिंचन योजना ४.५०, दहिगाव उपसा सिंचन योजना १.८१, भीमा सीना जोड कालवा योजना ३.१५, सांगोला उपसा सिंचन योजना २, एकरूप उपसा सिंचन योजना ३.१६, आष्टी उपसा सिंचन योजना १ टीएमसी या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

शिवाय मंगळवेढ्यातील ३५ गावांसाठी ६ टीएमसी पाण्याची योजना या वर्षात मंजूर करून देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक प्रचारात केली आहे. दक्षिण सोलापूरमधील २२ गावांच्या पिण्याचे पाणी योजना निधीअभावी प्रतीक्षेत असताना शासनाने हा घेतलेला निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे, अशी भूमिका रयत क्रांतीने मांडली आहे.

----

लोकप्रतिनिधींनी मूक संमती दिली कशी?

या निर्णयाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मूक संमती दिलीच कशी, हा संतप्त सवाल सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये उभा राहिला आहे. यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेत ‘उजनी धरण हक्काचं पाणी बचाव आंदोलन’ हे जनांदोलन उभे करीत आहोत. आम्ही संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या या बेजबाबदार वर्तनाचा निषेध करीत आहोत. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सर्व विरोधी पक्षीय जन आंदोलनास रयत क्रांती संघटना पाठिंबा देत आहे, असे म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जलसंपदा विभाग व मुख्यमंत्री कार्यालयास पाठवलेल्या आहेत, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.

----