शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

चांदणी नदीच्या पुरामुळे पाच गावचे पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST

बार्शी : बार्शी तालुक्यातून भोगावती, नीलकंठा, राम आणि चांदणी या चार प्रमुख नद्या वाहतात. मात्र, यंदा सर्वात चर्चेत ...

बार्शी : बार्शी तालुक्यातून भोगावती, नीलकंठा, राम आणि चांदणी या चार प्रमुख नद्या वाहतात. मात्र, यंदा सर्वात चर्चेत राहिली आहे ती बालघाटच्या डोंगर रांगातून वाहत असलेली चांदणी नदी. या नदीच्या कॅचमेन्ट एरियात यंदा दमदार पाऊस झाल्याने नदीला पुन्हा पूर आला आहे. त्यामुळे या नदीवरील मांडेगाव, कांदलगाव, धस पिंपळगाव, देवगाव, आगळगावचे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यानिमित्ताने आता या सर्व पुलांच्या उंचीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने मांडेगावसह देवळाली, अरसोली व भूम वरून येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली आहे. सध्या शेतकरी उडीद काढणीच्या कामास लागले असतानाच पावसाने जोर धरला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मांडेगावमधील ग्रामस्थांना बार्शीला जाणे मुश्किल झाले आहे. ग्रामस्थांकडून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.

मांडेगाव येथे बाभूळगाव तलाव, मांडेगाव तलाव, बांगरवाडी तलाव या तलावांचे सांडवे सुटले आहेत. येरमाळा पश्चिम भागातील पडणारे सर्व पाणी मांडेगाव येथील पुलावरून वाहत असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याच नदीवरील धस पिंपळगाव येथे ही कायम अशीच परिस्थिती असते. खाली बार्शीहून देवगावमार्गे भूमकडे जाणारा पूलही सातत्याने पाण्याखाली जात आहे. कांदलगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून पुलावरील पाणीच कमी झाले नाही.

---

दरवर्षी पावसाळ्यात आम्हांला या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मांडेगाव येथील पुलाची उंची वाढवावी.

- पंडित मिरगणे

सरपंच

---

आमचे गावही तालुक्यातील बॉर्डरवरील गाव आहे. गावाच्या कडेला असलेल्या चांदणी नदीवरील पूल छोटा असल्याने सतत पुलावर पाणी वाहते. त्यामुळे कोणालाच बार्शीकडे येता येत नाही. परवाच एक जण वाहून जाताना वाचला आहे. या पुलाची उंची वाढवण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत.

- किरण कोकाटे

धस पिंपळगाव

---

चांदणी नदीवरील नळ्याचा पूल मोठा पाऊस पडला की पाण्याखाली जातो. त्यामुळे नदीपलीकडे जमिनी असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन खरिपाच्या सुगीत मोठे हाल होतात. परांडा तालुक्यातील सिरसाव, सोने कांदलगाव, घारगाव आदी गावातील लोकांचीही गैरसोय होते. याठिकाणी कमानीच्या मोठ्या पुलाची गरज आहे.

- प्रदीप नवले

सरपंच, कांदलगाव

----

फोटो : १३ बार्शी १

१३ बार्शी २

मांडेगाव व कांदलगाव येथील पुलावरून पाणी वाहत असलेले फोटो आहेत.