शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पहिले ‘रेशीम पार्क’ तीन वर्षांनंतरही लटकलेलेच, जागेचे शुक्लकाष्ट संपेना

By admin | Updated: June 23, 2017 16:03 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केलेल्या राज्यातील पहिल्या‘रेशीम पार्क’च्या उभारणीचा प्रश्न तीन वर्षांत मार्गी लागू शकला नाही. अगोदर बीबीदारफळ येथील जमिनीला ‘माळढोक’ची अडचण सांगितली जात होती आता हिरजच्या जागेचे प्रकरण न्यायालयात आहे.राज्यात वरचेवर तुतीच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. अगोदर मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची असलेली तुतीची शेती आता राज्यभरात व्यापली आहे. वरचेवर तुतीचे क्षेत्र वाढत असल्यानेच तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने राज्यातील पहिले ‘रेशीम पार्क’सोलापूर जिल्ह्यात मंजूर केले होते. रेशीम पार्कच्या मंजुरी आदेशातच उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावावरील गायरान जमीन ताब्यात घेण्याबाबत म्हटले होते. शासन आदेशानंतर बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावावरील ५७६ गट नंबरमधील ५१.१९ हेक्टरपैकी २५ हेक्टर जमीन संचालक रेशीम उद्योग संचालनालय नागपूर यांच्या नावे करण्यात आली. उर्वरित २६ हेक्टर १९ आर जमीन ही आजही बीबीदारफळ ग्रामपंचायतीच्या नावे आहे. ‘रेशीम पार्क’उभारणीसाठी ही जमीन रेशीम उद्योग संचालनालयाच्या नावे करण्यात आली खरी ; मात्र स्वतंत्र उतारा तयार करताना ‘माळढोक’ पक्षी अभयारण्याचा अडथळा आला. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील खासगी क्षेत्र माळढोकमधून वगळण्यात आले; मात्र हे क्षेत्र वगळण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्यानंतर बीबीदारफळ ऐवजी दुसऱ्या जागेचा शोध सुरु झाला. जिल्हा रेशीम विकास अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमीन उपलब्ध करण्यासाठी पत्र दिले. त्यानुसार हिरज येथील गट नंबर ४२३ मधील चार हेक्टर जमीन देण्यात आली. ग्रामपंचायतीची गावठाण जमीन असल्याने ठरावाद्वारे ‘रेशीम पार्क’साठी देण्यात आली; मात्र याचा वाद आता न्यायालयात सुरू आहे.--------------------------थकबाकीत करमाळ्याची आघाडी.........च्थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये करमाळ्याची आघाडी असून, १३ हजार २८६ शेतकऱ्यांकडे १०५ कोटी ४७ लाख तर दक्षिण सोलापूर तालुक्यात ५४२९ शेतकऱ्यांकडे ९३ कोटी ६२ लाख इतकी थकबाकी आहे, मंगळवेढा तालुक्यात ७२३८ शेतकऱ्यांकडे ८७ कोटी ४२ लाख, बार्शीच्या १४ हजार ५३२ शेतकऱ्यांकडे ८२ कोटी ६२ लाख, माढ्याच्या ७६४२ शेतकऱ्यांकडे ८१ कोटी ६० लाख, अक्कलकोटच्या ८६३४ शेतकऱ्यांकडे ७९ कोटी ४२ लाख, पंढरपूरच्या ४९०५ शेतकऱ्यांकडे ४१ कोटी ९६ लाख. अन्य चार तालुक्याची थकबाकी यापेक्षा कमी आहे.