शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमा’चा पहिला हप्ता दोन हजार थकीत बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते. महाडिक म्हणाले, मागील चार-पाच वर्षे जिल्ह्यात ...

यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, मागील चार-पाच वर्षे जिल्ह्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. अशा कठीण परिस्थितीत कारखाना बंद ठेवून उपलब्ध ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी द्यावा लागला. हंगाम २०१५-२०१६ मध्ये केवळ ११५ दिवस कारखाना चालू शकला. यानंतर हंगाम २०१६-२०१७ मध्ये तर १ लाख ४३ हजार मेट्रिक टन इतकेच उसाचे गाळप होऊ शकले. हंगाम २०१७-२०१८ व हंगाम २०१८-२०१९ मध्येही जवळपास तशीच परिस्थिती राहिल्याने कारखाना चालवणे कठीण झाले. त्यानंतर हंगाम २०१९-२०२० मध्ये उसाअभावी कारखाना बंद ठेवावा लागला. त्यानंतर सातत्याने कारखान्यापुढे अनंत अडचणी वाढत गेल्या. शेतकऱ्यांची उसाची बिले, कामगारांचे वेतन, वाहतूक यंत्रणा यांची देणी थकली गेली.

हंगाम २०१८-२०१९ मध्ये ११७ दिवस गाळप झाले होते. त्यामध्ये तीन लाख ४९ हजार २१४ टन उसाचे गाळप केले. त्या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देणे फार कठीण झाल्याने त्यावेळी संपूर्ण एफआरपी देता आली नाही. एफआरपीची रक्कम २२६८ रुपये इतकी जाहीर केली होती. परंतु कारखान्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना दोन हजार तर काही शेतकऱ्यांना १७७० रुपयेप्रमाणे एफआरपीची रक्कम देण्यात आली. त्यामुळे हंगाम २०१८-२०१९ मधील सर्वच शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम १४ डिसेंबरपासून बँक खात्यात जमा करणे सुरू आहे. तसेच गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीपैकी पहिली उचल म्हणून प्रतिटन दोन हजार रुपये अदा करण्यात आले आहेत, असे चेअरमन धनंजय महाडिक यांनी सांगितले.