शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

‘भीमा’चा पहिला हप्ता दोन हजार थकीत बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते. महाडिक म्हणाले, मागील चार-पाच वर्षे जिल्ह्यात ...

यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, मागील चार-पाच वर्षे जिल्ह्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. अशा कठीण परिस्थितीत कारखाना बंद ठेवून उपलब्ध ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी द्यावा लागला. हंगाम २०१५-२०१६ मध्ये केवळ ११५ दिवस कारखाना चालू शकला. यानंतर हंगाम २०१६-२०१७ मध्ये तर १ लाख ४३ हजार मेट्रिक टन इतकेच उसाचे गाळप होऊ शकले. हंगाम २०१७-२०१८ व हंगाम २०१८-२०१९ मध्येही जवळपास तशीच परिस्थिती राहिल्याने कारखाना चालवणे कठीण झाले. त्यानंतर हंगाम २०१९-२०२० मध्ये उसाअभावी कारखाना बंद ठेवावा लागला. त्यानंतर सातत्याने कारखान्यापुढे अनंत अडचणी वाढत गेल्या. शेतकऱ्यांची उसाची बिले, कामगारांचे वेतन, वाहतूक यंत्रणा यांची देणी थकली गेली.

हंगाम २०१८-२०१९ मध्ये ११७ दिवस गाळप झाले होते. त्यामध्ये तीन लाख ४९ हजार २१४ टन उसाचे गाळप केले. त्या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देणे फार कठीण झाल्याने त्यावेळी संपूर्ण एफआरपी देता आली नाही. एफआरपीची रक्कम २२६८ रुपये इतकी जाहीर केली होती. परंतु कारखान्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना दोन हजार तर काही शेतकऱ्यांना १७७० रुपयेप्रमाणे एफआरपीची रक्कम देण्यात आली. त्यामुळे हंगाम २०१८-२०१९ मधील सर्वच शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम १४ डिसेंबरपासून बँक खात्यात जमा करणे सुरू आहे. तसेच गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीपैकी पहिली उचल म्हणून प्रतिटन दोन हजार रुपये अदा करण्यात आले आहेत, असे चेअरमन धनंजय महाडिक यांनी सांगितले.