शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

‘भीमा’चा पहिला हप्ता दोन हजार थकीत बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:38 IST

यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते. महाडिक म्हणाले, मागील चार-पाच वर्षे जिल्ह्यात ...

यावेळी उपाध्यक्ष सतीश जगताप, कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे व संचालक मंडळ उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, मागील चार-पाच वर्षे जिल्ह्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. अशा कठीण परिस्थितीत कारखाना बंद ठेवून उपलब्ध ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी द्यावा लागला. हंगाम २०१५-२०१६ मध्ये केवळ ११५ दिवस कारखाना चालू शकला. यानंतर हंगाम २०१६-२०१७ मध्ये तर १ लाख ४३ हजार मेट्रिक टन इतकेच उसाचे गाळप होऊ शकले. हंगाम २०१७-२०१८ व हंगाम २०१८-२०१९ मध्येही जवळपास तशीच परिस्थिती राहिल्याने कारखाना चालवणे कठीण झाले. त्यानंतर हंगाम २०१९-२०२० मध्ये उसाअभावी कारखाना बंद ठेवावा लागला. त्यानंतर सातत्याने कारखान्यापुढे अनंत अडचणी वाढत गेल्या. शेतकऱ्यांची उसाची बिले, कामगारांचे वेतन, वाहतूक यंत्रणा यांची देणी थकली गेली.

हंगाम २०१८-२०१९ मध्ये ११७ दिवस गाळप झाले होते. त्यामध्ये तीन लाख ४९ हजार २१४ टन उसाचे गाळप केले. त्या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देणे फार कठीण झाल्याने त्यावेळी संपूर्ण एफआरपी देता आली नाही. एफआरपीची रक्कम २२६८ रुपये इतकी जाहीर केली होती. परंतु कारखान्याच्या काही तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना दोन हजार तर काही शेतकऱ्यांना १७७० रुपयेप्रमाणे एफआरपीची रक्कम देण्यात आली. त्यामुळे हंगाम २०१८-२०१९ मधील सर्वच शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम १४ डिसेंबरपासून बँक खात्यात जमा करणे सुरू आहे. तसेच गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीपैकी पहिली उचल म्हणून प्रतिटन दोन हजार रुपये अदा करण्यात आले आहेत, असे चेअरमन धनंजय महाडिक यांनी सांगितले.