शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

...अखेर कालव्याचे दार काढून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:23 IST

पंंढरपूर : नीरा उजवा कालवा फलटणअंतर्गत येणाऱ्या तिसंगी-सोनके तलावातून बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास पाणी सोडण्यात आले. दरम्यान, त्याआधी पाटबंधारे ...

पंंढरपूर : नीरा उजवा कालवा फलटणअंतर्गत येणाऱ्या तिसंगी-सोनके तलावातून बुधवारी साडेचार वाजेच्या सुमारास पाणी सोडण्यात आले. दरम्यान, त्याआधी पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागातील टीमने कालव्याचे नादुरूस्त झालेले दार काढण्यात यश मिळविले. यामुळे लाभक्षेत्रातील ९ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तिसंगी-सोनके तलाव लाभक्षेत्रातील गादेगाव, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, शेळवे, खेडभाळवणी आदी गावांना रबी व उन्हाळी हंगामात पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रबी हंगामासाठी पाणी सोडत असताना तलावातील कालव्याचे दार नादुरुस्त झाल्याने पाणी सोडण्यास अडचणी येत होत्या. याबाबत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता कार्यकारी अभियंता बोडखे, उपविभागीय अभियंता नागेंद्र ताठी, शाखा अभियंता अभिजित म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कालव्याचे दार काढण्यात यांत्रिकी टीमला यश आले. यामुळे लाभ क्षेत्रातील नऊ गावांतील उभ्या पिकांना जीवदान मिळणार आहे. शेतकऱ्यांमधून याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाकडून काटेकोर नियोजन करून रबी व उन्हाळी हंगामात पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.