शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांतील अनुशेष भरणार

By admin | Updated: May 11, 2014 01:19 IST

पणन संचालक : सुभाष माने यांची माहिती

 

सोलापूर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. तो लवकरच प्रमाणित करून अनुशेष पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे नूतन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी सोलापुरात बोलताना दिली. डॉ. सुभाष माने हे दोन दिवसांच्या सोलापूर दौर्‍यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या सचिवांची आढावा बैठक सोलापूर बाजार समितीमध्ये पार पडली. आज सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप करताना त्यांनी पणन खात्याशी संबंधित योजनांची माहिती दिली. बाजार समित्यांमध्ये दीर्घकाळापासून मागासवर्गीय कर्मचार्‍यांचा अनुशेष आहे. हे कर्मचारी न्यायालयीन लढा देत असताना त्यांना पणन विभागाकडून न्यायाची अपेक्षा आहे. याकडे डॉ. माने यांचे लक्ष वेधण्यात आले असता ते म्हणाले, आज सकाळीच कास्ट्राईब संघटनेचे पदाधिकारी मला भेटले, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही मोठा अनुशेष असून दीर्घकाळापासून तो तसाच असल्याने पदोन्नती रखडली. भरती प्रक्रिया सदोष असल्याची त्यांची तक्रार मला मिळाली आहे. राज्यभरात हीच स्थिती कमी-जास्त प्रमाणात आहे. सर्वच बाजार समित्यांच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यांचा अनुशेष भरण्यासाठी मी पुढाकार घेईन. आधारभूत किमतीत शेतीमालाचे खरेदी केंद्र उघडताना बाजार समित्या चालढकल करतात. याकडेही पणन संचालकांचे लक्ष वेधण्यात आले. शासन खाजगी बाजार समित्यांना प्रोत्साहन देत असल्याने राज्यात ३३ नव्या बाजार समित्यांना परवाने देण्यात आले. शेतीमालाची खरेदी-विक्री नियमित सुलभपणे व्हावी, शेतकर्‍यांना न्याय मिळावा, त्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात याकडे पणन खाते लक्ष देत असल्याने शेतकर्‍यांच्या तक्रारीत घट झाल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------------

भूविकास बँकांना टाळे... ४राज्यातील भूविकास बँका शेवटच्या घटका मोजत आहेत. राज्य मंत्रिमंडळात भूविकास बँका पुन्हा सुरू करण्यासंदर्भात चर्चा घडल्या मात्र प्राप्त परिस्थितीत या बँका सुरू होण्याची शक्यता धुसर असल्याची माहिती डॉ. माने यांनी दिली. ४१९९७ पासून भूविकास बँकांनी कर्जवाटप बंद केले आहे. सध्या कर्मचार्‍यांच्या वेतनाइतकी रक्कम वसूल होत आहे. ४जिल्हा शाखेसह शिखर बँकेची संपूर्ण मालमत्ता शासकीय मूल्यांकनाप्रमाणे ३१२ कोटींची आहे. ४या बँका पुन्हा सुरू करण्यासाठी १४00 कोटींची गरज आहे. ही रक्कम उपलब्ध होणे शक्य नसल्याने बँकांचे भवितव्य अंधकारमय बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले

. -----------------------------------------------------

माहितीचा अधिकार... बाजार समित्यांना माहितीचा अधिकार लागू आहे. माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केल्यास अपिलाची तरतूद आहे. नागरिकांनी त्याचा वापर केला पाहिजे़ काही बाजार समित्या टाळाटाळ करीत आहेत हे योग्य नाही...... - डॉ.सुभाष माने पणन संचालक