शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

फेब्रुवारीतच रेल्वेला मिळाले अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:21 IST

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचा द्राक्षे एक्सपोर्ट करण्याकडे कल ...

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचा द्राक्षे एक्सपोर्ट करण्याकडे कल आहे.

रेल्वेने किसान रेल्वे सुरू करून सोलापूर व शेजारच्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, केळी, लिंबू, पेरू, बोर, सीताफळ, खरबूज, शिमला मिरची यासह इतर फळपिकांना बिहार, कोलकत्ता, दिल्ली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकरण सुधारले आहे.

सांगोला रेल्वेस्थानकातून सांगोला ते हावडा, सांगोला ते आदर्शनगर (दिल्ली), सांगोला ते शालिमार (कोलकाता), सांगोला-मुझफ्फरपूर अशा चार किसान रेल्वे सुरू असल्यामुळे सांगोला रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे.

हंगामानुसार या किसान रेल्वेतून फळपिकांची वाहतूक करण्यात येत आहे. सध्या सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना किसान रेल्वे वरदान ठरत आहे.

५२ हजार ५७४ क्विंटल मालाची वाहतूक

सोलापूरच्या द्राक्षाला कोलकाता, दिल्ली व बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत किसाने रेल्वेद्वारे तब्बल ५२ हजार ५७४ क्विंटल द्राक्ष, खरबुजाची वाहतूक करण्यात आली असून, अद्यापही द्राक्षाची वाहतूक सुरूच आहे. फेब्रुवारी महिन्यात रेल्वेला २ कोटी ४९ लाख २७ हजार ७७५ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

किसान रेल्वेमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ

गेल्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी सांगोला स्थानकातून पहिली किसान रेल्वे धावली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाच किसान रेल्वे सुरू केल्या. ऑगस्टपासून किसान रेल्वेमुळे रेल्वेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न सांगोला स्थानकातून रेल्वेला मिळाले, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर द्राक्षांच्या बागा असल्याने किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. मार्च महिन्यात रेल्वेला तीन कोटींहून अधिक उत्पन्न मिळेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट ::::::::::::::

किसान रेल्वेने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविली. कमी वेळेत शेतीमाल देशातील बाजारपेठेत पाठविणे शक्य झाले आहे. वाहतूक दरात ५० टक्के सबसिडी दिली जात आहे. उत्पन्नाच्या बाबतीत रेल्वेच्या सोलापूर विभागात सांगोला रेल्वेस्थानक प्रथम क्रमांकावर आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान रेल्वेच्या सुविधेचा लाभ घ्यावा.

- चेतनसिंह केदार-सावंत

तालुकाध्यक्ष, भाजप

फोटो ओळ ::::::::::::::::::::::::

परराज्यातील बाजारपेठेत पाठविण्यासाठी सांगोला रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्यांनी डाळिंबासह द्राक्ष, खरबूज, शेती मालासह गर्दी केल्याचे छायाचित्र.