शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

फेब्रुवारीतच रेल्वेला मिळाले अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:21 IST

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचा द्राक्षे एक्सपोर्ट करण्याकडे कल ...

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांचा द्राक्षे एक्सपोर्ट करण्याकडे कल आहे.

रेल्वेने किसान रेल्वे सुरू करून सोलापूर व शेजारच्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, केळी, लिंबू, पेरू, बोर, सीताफळ, खरबूज, शिमला मिरची यासह इतर फळपिकांना बिहार, कोलकत्ता, दिल्ली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकरण सुधारले आहे.

सांगोला रेल्वेस्थानकातून सांगोला ते हावडा, सांगोला ते आदर्शनगर (दिल्ली), सांगोला ते शालिमार (कोलकाता), सांगोला-मुझफ्फरपूर अशा चार किसान रेल्वे सुरू असल्यामुळे सांगोला रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे.

हंगामानुसार या किसान रेल्वेतून फळपिकांची वाहतूक करण्यात येत आहे. सध्या सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना किसान रेल्वे वरदान ठरत आहे.

५२ हजार ५७४ क्विंटल मालाची वाहतूक

सोलापूरच्या द्राक्षाला कोलकाता, दिल्ली व बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत किसाने रेल्वेद्वारे तब्बल ५२ हजार ५७४ क्विंटल द्राक्ष, खरबुजाची वाहतूक करण्यात आली असून, अद्यापही द्राक्षाची वाहतूक सुरूच आहे. फेब्रुवारी महिन्यात रेल्वेला २ कोटी ४९ लाख २७ हजार ७७५ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

किसान रेल्वेमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ

गेल्या वर्षी २१ ऑगस्ट रोजी सांगोला स्थानकातून पहिली किसान रेल्वे धावली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाच किसान रेल्वे सुरू केल्या. ऑगस्टपासून किसान रेल्वेमुळे रेल्वेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न सांगोला स्थानकातून रेल्वेला मिळाले, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर द्राक्षांच्या बागा असल्याने किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. मार्च महिन्यात रेल्वेला तीन कोटींहून अधिक उत्पन्न मिळेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट ::::::::::::::

किसान रेल्वेने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविली. कमी वेळेत शेतीमाल देशातील बाजारपेठेत पाठविणे शक्य झाले आहे. वाहतूक दरात ५० टक्के सबसिडी दिली जात आहे. उत्पन्नाच्या बाबतीत रेल्वेच्या सोलापूर विभागात सांगोला रेल्वेस्थानक प्रथम क्रमांकावर आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान रेल्वेच्या सुविधेचा लाभ घ्यावा.

- चेतनसिंह केदार-सावंत

तालुकाध्यक्ष, भाजप

फोटो ओळ ::::::::::::::::::::::::

परराज्यातील बाजारपेठेत पाठविण्यासाठी सांगोला रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्यांनी डाळिंबासह द्राक्ष, खरबूज, शेती मालासह गर्दी केल्याचे छायाचित्र.