शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

पिता-पुत्रांनी शेजाऱ्याचा ४५० पेंड्या चारा पेटविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:15 IST

बलवडी येथील आत्माराम पांडुरंग शिंदे यांनी शेतात गेल्यावर्षी ४५० पेड्यांची बाजरीची गंज (बुचड) लावली होती. गावात त्यांच्या शेजारी सुरज ...

बलवडी येथील आत्माराम पांडुरंग शिंदे यांनी शेतात गेल्यावर्षी ४५० पेड्यांची बाजरीची गंज (बुचड) लावली होती. गावात त्यांच्या शेजारी सुरज राजेंद्र पंडित हा कुटुंबासह राहण्यास असून दोघांमध्ये अधूनमधून भांडणतंटा होत होता. २३ जून रोजी आत्माराम शिंदे यांचा मुलगा विजय व सूरज पंडित यांच्यात घरातील टेपच्या आवाजावरून वादावादी झाली. त्यावेळी सूरजने विजय शिंदे यास मी तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास शेताजवळील नवनाथ निंबाळकर यांनी आत्माराम शिंदे यांच्या घरी येऊन तुमच्या शेतातील बाजरीची बुचड सुरज पंडित व त्याचे वडील राजेंद्र पंडित यांनी पेटवून दिल्याचे सांगितले. त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता ४५० पेंड्याची बुचड जळून खाक झाल्याने त्यांचे सुमारे ४५०० हजार रुपयाचे नुकसान झाले. याबाबत आत्माराम शिंदे यांनी सुरज पंडित व राजेंद्र पंडित पिता-पुत्राविरुध्द पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.