शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली मृगाची प्रतिक्षा, खरीप हंगामासाठी प्रशासन सज्ज, बियाणे, खतांची उपलब्धता

By admin | Updated: June 3, 2017 17:07 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी प्रशासनाच्या कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. खते आणि बियाणांची उपलब्धता झाली असून आता मान्सून बरसण्याची प्रतीक्षा आहे.सोलापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ १४ लाख ८८ हजार हेक्टर असून लागवडलायक क्षेत्र ११ लाख ७३ हजार हेक्टर आहे. मागील खरिपाचे पेरणी क्षेत्र ९१ हजार हेक्टर होते. रब्बीचे आठ लाख ३२ हजार हेक्टर तर उन्हाळी पिकांचे क्षेत्र आठ हजार हेक्टर होते. २०१७-१८ च्या जिल्ह्यातील कृषी हंगामासाठी सरासरी मागीलप्रमाणे क्षेत्र गृहीत धरण्यात आले असून खरिपाच्या तीन लाख आठ हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी २९ हजार १७२ क्ंिवटल महाबीज आणि खासगी बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. एक लाख ४१ हजार ५०० मेट्रिक टन खत प्राप्त झाले असून मागील हंगामातील ६८ हजार ५०२ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यातून यंदाच्या हंगामातील खताची गरज पूर्ण होणार आहे.शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, या दृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानातील विहिरी जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. --------------------यंदा तुरीचे क्षेत्र घटण्याची शक्यताच्मागील हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन होऊनही सरकारकडून तूर खरेदीसंदर्भात झालेली चालढकल लक्षात घेता यावर्षी जिल्ह्यातील तुरीचा पेरा घटण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात सर्वाधिक उत्पादन आणि पेरा तुरीचा होता. मात्र कमी भाव आणि खरेदी नसल्याने शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यास उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच उडीद, सोयाबीन, मुगाचा पेरा वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. ---------------------खते आणि बियाणांचे वाटप योग्यपणे व्हावे, यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर अनुक्रमे कृषी विकास अधिकारी आणि तालुका कृषी विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासोबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी निविष्ठा तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही तिन्ही पथके बियाणे आणि खतांच्या वाटपावर लक्ष ठेवणार असून प्रत्येक कृषी केंद्रांच्या तपासणीचे आदेशही समितीला देण्यात आले आहेत.